शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या तरतुदींना धक्का लागता कामा नये, रालोआ खासदारांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:57 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये आणि या कायद्याखाली अटक करणे बंधनकारक नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात भाजपा व मित्रपक्षांचे खासदारच आता एकत्र आले आहेत.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये आणि या कायद्याखाली अटक करणे बंधनकारक नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात भाजपा व मित्रपक्षांचे खासदारच आता एकत्र आले आहेत.राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दलित व आदिवासी खासदारांनी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेऊ न, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका करावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे या सर्वांचे म्हणणे आहे. ही मागणी आपण पंतप्रधानांना सांगू, असे आश्वासन गहलोत यांनी खासदारांना दिले.एखादे प्रकरणे खरे असतानाही पोलीस अधीक्षकाने गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली नाही वा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाºयाला अटक करण्याची संमती दिली नाही, तर हा कायदाच निरर्थक ठरेल. एखाद्या प्रकरणाच्या आधारे दिलेल्या निकालामुळे कायद्याचा मूळ गाभा व तो करण्यामागील कारण यांनाच धक्का बसणार आहे, अशी भीती या दलित खासदारांना वाटत आहे.या कायद्याखाली दाखल झालेली सर्वच प्रकरणे खोटीनसतात. त्यामुळे त्याचा सरसकट गैरवापर होतो, असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच सर्वच कायद्यांचा काही ना काही प्रमाणात गैरवापर होतच असतो. त्यामुळे कायद्यातील तरतुदींना धक्का लावणे अयोग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कायद्याला अर्थच राहणार नाही, असे खासदारांचे मत आहे.पासवान, आठवले हेही भेटलेया खासदारांप्रमाणे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही हीच भूमिका आहे. त्यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविषयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. आठवले यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली.काँग्रेसच्या मागणीनंतर भाजपाला आली जागकाँग्रेसनेही अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंबंधीच्या न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने पुनर्विचार याचिका सादर करावी, अशी मागणी याआधीच केली आहे. न्यायालयाच्या निकालामुळे या कायद्याचे महत्त्व संपून जाईल, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली होती. येत्या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आल्याचे दिसल्यावर आता भाजपा खासदारांना जाग आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय