शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेचे प्रश्न हद्दपार, विरोधी पक्षाच्या खासदारांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:49 IST

Politics News: लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्तारूढ पक्षातर्फे सभागृह चालविण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकार जनविरोधी -प्रियंका चतुर्वेदीशिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभापतींकडे अनेकदा विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केला. या सूचनांवर सभापती महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. सरकारची भूमिका जनविरोधी आहे.” विधेयक संमत करण्याशिवाय कोणतेही काम या अधिवेशनात झालेले नसल्याचा आरोप खासदार चतुर्वेदी यांनी केला.

बोगस अधिवेशन -बाळू धानोरकरया अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, या अधिवेशनातून सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही. एक बोगस असे या अधिवेशनाला म्हणता येईल. सत्तारूढ पक्षाकडून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेले जात आहे. सामान्यांचे प्रश्न मात्र चर्चेला येत नाहीत. महागाईविरोधात विरोधकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, असे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सांगितले.

सरकार बेमुरवत - सुनील तटकरेकेंद्र सरकार हे बेमुर्वत असून, जनतेच्या प्रश्नांना या सरकारच्या लेखी काहीही महत्त्व नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सातत्याने सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शक्य होऊ शकले नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

अधिवेशन यशस्वी - गिरीश बापटअर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला. जनतेच्या विकासासाठी असलेली अनेक विधेयके संसदेने संमत केली. प्रश्नोत्तरे, विविध विषयांवर झालेल्या चर्चेत जनतेच्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार