शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून जनतेचे प्रश्न हद्दपार, विरोधी पक्षाच्या खासदारांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:49 IST

Politics News: लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली : लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता केवळ विधेयक संमत करण्यासाठी उपयोग होत आहे. या महत्त्वपूर्ण अधिवेशनातून जनतेच्या हाती काहीही मिळाले नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षाच्या खासदारांनी भावना व्यक्त केल्या.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सत्तारूढ पक्षातर्फे सभागृह चालविण्याच्या प्रक्रियेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकार जनविरोधी -प्रियंका चतुर्वेदीशिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभापतींकडे अनेकदा विविध आयुधांच्या माध्यमातून प्रयत्न केला. या सूचनांवर सभापती महोदयांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. सरकारची भूमिका जनविरोधी आहे.” विधेयक संमत करण्याशिवाय कोणतेही काम या अधिवेशनात झालेले नसल्याचा आरोप खासदार चतुर्वेदी यांनी केला.

बोगस अधिवेशन -बाळू धानोरकरया अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, या अधिवेशनातून सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही. एक बोगस असे या अधिवेशनाला म्हणता येईल. सत्तारूढ पक्षाकडून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेले जात आहे. सामान्यांचे प्रश्न मात्र चर्चेला येत नाहीत. महागाईविरोधात विरोधकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, असे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी सांगितले.

सरकार बेमुरवत - सुनील तटकरेकेंद्र सरकार हे बेमुर्वत असून, जनतेच्या प्रश्नांना या सरकारच्या लेखी काहीही महत्त्व नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सातत्याने सामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु, सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शक्य होऊ शकले नाही, असेही तटकरे यांनी सांगितले.

अधिवेशन यशस्वी - गिरीश बापटअर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत यशस्वी झाल्याचा दावा भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केला. जनतेच्या विकासासाठी असलेली अनेक विधेयके संसदेने संमत केली. प्रश्नोत्तरे, विविध विषयांवर झालेल्या चर्चेत जनतेच्याच प्रश्नांवर चर्चा झाल्याचे खासदार बापट यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार