शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

यूपीएमध्ये मतभेद, नितीश यांचा एनडीएचे उमेदवार कोविंद यांना पाठिंबा

By admin | Updated: June 21, 2017 22:21 IST

. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून यूपीएमधले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. पाटण्यात संयुक्त जनता दलाच्या नेत्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नितीश कुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं यूपीएच्या एकीला सुरूंग लागला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊ भाजपाचा उमेदवार पाडायचा, अशी भूमिका मांडली होती. नितीश कुमार यांनी पाठिंबा दिल्यानं रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदावरचा दावा आणखी भक्कम झाला आहे. नितीश यांच्या पाठिंब्यामुळे कोविंद यांना 70 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीएसुद्धा लवकरात लवकर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे देण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुख आणि द्रमुक पक्षानंसुद्धा कोविंद यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. कोविंद यांना अनेक पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यानं काँग्रेससमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नितीश कुमार सोबत राहावेत यासाठी काँग्रेसकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र नितीश कुमार यांनी कोविंद यांच्या पारड्यात वजन टाकल्यानं काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांसोबतच राहू, असा विश्वास काँग्रेससह यूपीएला दिला होता. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत नितीश कुमार यांची चर्चासुद्धा झाली होती. नितीश कुमार यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर करताना कारणंही स्पष्ट केली आहेत. रामनाथ कोविंद बिहारच्या राज्यपालपदी त्यांनी कधीही सरकारसमोर अडचणी निर्माण केल्या नाहीत. त्यामुळेच नितीश कुमारांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्याची चर्चा आहे.