शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मुस्लिमांचे प्रश्न टाळणे विरोधी पक्षांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला.

- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा (सामाजिक कार्यकर्ते)लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला. या अपयशासाठी त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. मुस्लीम समाजाकरिता ही निवडणूक फार विचित्र होती. त्यांना या निवडणुकीत मुद्दाम रस नव्हता. त्यामागे विविध कारणे होती. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी गेली पाच वर्षे सतत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांवर सामूहिक हल्ले केले.गोरक्षणाच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार केले. तिहेरी तलाकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यात आला. अशा गंभीर घटना घडत असताना विरोधातील एकाही पक्षाने आवाज उठवला नाही.दुसºया बाजूने सत्ताधाऱ्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तसेच, या निवडणुकीत एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुस्लीम समाजाच्या विकासाचा मुद्दा नव्हता. सर्वत्र केवळ मुस्लीमविरोधी वातावरण होते. या निवडणुकीत मुस्लिमांना भाजपने फक्त ७ तर, काँग्रेसने २४ तिकिटे दिली. परंतु, त्यांना निवडून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.याउलट प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी वायनाडमधून काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज विजयी झालेहोते.या वेळी त्या जागेवर राहुल गांधी उभे राहिले. तसेच, बिहारमध्ये जिंकण्याची ताकद असणारे शकील अहमद यांचे तिकीट काँग्रेसने कापले. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांमध्ये मुस्लिमांचा समावेश नव्हता. त्यांना प्रचारात उतरविण्याचे प्रयत्नदेखील झालेनाहीत.परिणामी, या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि निकालाचे अवलोकन केल्यास विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्याचे दिसते.या निकालाचा मुस्लीम समाजावर विविध बाबतीत प्रभाव पडेल. ते आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर उभे होण्याचा प्रयत्न करतील. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतील. तसेच, विशिष्ट गटाने जाणीवपूर्वक खराब केलेली प्रतिमा सुधारतील.या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्या.