शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

मुस्लिमांचे प्रश्न टाळणे विरोधी पक्षांना महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 05:23 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला.

- अ‍ॅड. फिरदोस मिर्झा (सामाजिक कार्यकर्ते)लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना पुन्हा एकदा सपाटून मार खावा लागला. या अपयशासाठी त्यांनी मुस्लीम समाजाच्या प्रश्नांकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले. मुस्लीम समाजाकरिता ही निवडणूक फार विचित्र होती. त्यांना या निवडणुकीत मुद्दाम रस नव्हता. त्यामागे विविध कारणे होती. सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी गेली पाच वर्षे सतत मुस्लिमांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांवर सामूहिक हल्ले केले.गोरक्षणाच्या नावावर त्यांच्यावर अत्याचार केले. तिहेरी तलाकच्या माध्यमातून मुस्लिमांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यात आला. अशा गंभीर घटना घडत असताना विरोधातील एकाही पक्षाने आवाज उठवला नाही.दुसºया बाजूने सत्ताधाऱ्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तसेच, या निवडणुकीत एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यात मुस्लीम समाजाच्या विकासाचा मुद्दा नव्हता. सर्वत्र केवळ मुस्लीमविरोधी वातावरण होते. या निवडणुकीत मुस्लिमांना भाजपने फक्त ७ तर, काँग्रेसने २४ तिकिटे दिली. परंतु, त्यांना निवडून आणण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.याउलट प्रज्ञासिंह ठाकूरसारख्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली. गेल्या वेळी वायनाडमधून काँग्रेसचे एम. आय. शाहनवाज विजयी झालेहोते.या वेळी त्या जागेवर राहुल गांधी उभे राहिले. तसेच, बिहारमध्ये जिंकण्याची ताकद असणारे शकील अहमद यांचे तिकीट काँग्रेसने कापले. एवढेच नाही तर, विरोधी पक्षांच्या स्टार प्रचारकांमध्ये मुस्लिमांचा समावेश नव्हता. त्यांना प्रचारात उतरविण्याचे प्रयत्नदेखील झालेनाहीत.परिणामी, या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि निकालाचे अवलोकन केल्यास विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्याचे दिसते.या निकालाचा मुस्लीम समाजावर विविध बाबतीत प्रभाव पडेल. ते आता सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर उभे होण्याचा प्रयत्न करतील. भविष्यातील पिढीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतील. तसेच, विशिष्ट गटाने जाणीवपूर्वक खराब केलेली प्रतिमा सुधारतील.या निवडणुकीत मुस्लीम समाज तटस्थ राहिला व त्याचा फायदा भाजप व सहकारी पक्षांना मिळाला. देशात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे आणि विरोधी पक्षांनी चार ते पाच टक्के मतफरकाने जागा गमावल्या.