शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

विरोधकांनी मोदींचे आवाहन धुडकावले

By admin | Updated: December 5, 2014 02:04 IST

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौन सोडून राज्यसभेत स्पष्टीकरण दिले़ ज्योती यांनी माफी मागितली आहे़ त्यामुळे विरोधकांनी सभागृह चालू द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ मात्र पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या विरोधकांनी ज्योती यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली़ यामुळे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही संसदेत या मुद्यावर प्रचंड गदारोळ झाला़विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज पाच वेळाच्या स्थगितीनंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले़ लोकसभेत विरोधकांनी या मुद्यावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत सभात्याग केला़ पंतप्रधानांनंतर संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू आणि सभागृहाचे नेते तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही विरोधकांना संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याची विनंती केली़ विरोधक मात्र याउपरही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम राहिले़ ज्योती यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केलेली आहे़ माफी मागितलेली नाही, याकडेही काँग्रेस, माकपा, जदयू आदी नेत्यांनी लक्ष वेधले़ या गोंधळात राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले आणि सरतेशेवटी दिवसभरासाठी तहकूब करण्यातआले़ तिकडे लोकसभेत पंतप्रधानांनी या मुद्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी करीत विरोधकांनी सभात्याग केला़ गत तीन दिवसांपासून ज्योती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे़ सरकारने मात्र ज्योती यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा संपल्याचे सांगून ही मागणी धुडकावून लावली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)