शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:27 IST

एक्झिट पोलमुळे अस्वस्थता

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या तक्रारी, तसेच व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागण्या आणि विविध एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर पक्ष कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे नेत्यांकडून सतत केलेले आवाहन पाहता, विरोधी पक्षांनी आताच पराभवाची मानसिक तयारी ठेवली असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

काँग्रेस व सारेच विरोधी पक्ष ईव्हीएमविषयी तक्रारी करीत आले आहेत. यंत्रातील मतांची व्हीव्हीपॅट पावतीशी पडताळणी करावी, ही मागणीही केली, पण ती मान्य झालेली नाही. ईव्हीएमविषयीचे आक्षेपही मान्य झाले नाहीत. तरीही काँग्रेस व विरोधी पक्ष निकालाला एक दिवस शिल्लक असताना करतात, याचा अर्थच त्यांचा पराभव अटळ आहे, असे भाजप नेतेही सांगू लागले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, या पोलने खचून जाऊ नका, असे आवाहन बुधवारी कार्यकर्त्यांना केले, तसेच आवाहन सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केले होते.

एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. आॅस्ट्रेलियातील ५६ एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे निघाल्याची माहिती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना केंद्रामध्ये काँग्रेसच्या आघाडीचे व आंध्र प्रदेशात तेलगू देसमचेच सरकार येईल, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजदचे तेजस्वी यादव या नेत्यांनीही एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे खरे ठरते कीएक्झिट पोल खरे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जवळपास सर्वच एक्झिट पोलनी रालोआला २८६ ते ३0८ जागा (स्पष्ट बहुमत) तर यूपीएला ११३ जागा, तर पक्षांना ११५ जागांचा अंदाज दिला आहे. यूपीए व अन्य पक्ष मिळून २२८ होतात. ही संख्या बहुमतास पुरेशी नाही.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल