शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

विरोधकांनी केली पराभवाची मानसिक तयारी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:27 IST

एक्झिट पोलमुळे अस्वस्थता

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या तक्रारी, तसेच व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागण्या आणि विविध एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर पक्ष कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असे नेत्यांकडून सतत केलेले आवाहन पाहता, विरोधी पक्षांनी आताच पराभवाची मानसिक तयारी ठेवली असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

काँग्रेस व सारेच विरोधी पक्ष ईव्हीएमविषयी तक्रारी करीत आले आहेत. यंत्रातील मतांची व्हीव्हीपॅट पावतीशी पडताळणी करावी, ही मागणीही केली, पण ती मान्य झालेली नाही. ईव्हीएमविषयीचे आक्षेपही मान्य झाले नाहीत. तरीही काँग्रेस व विरोधी पक्ष निकालाला एक दिवस शिल्लक असताना करतात, याचा अर्थच त्यांचा पराभव अटळ आहे, असे भाजप नेतेही सांगू लागले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, या पोलने खचून जाऊ नका, असे आवाहन बुधवारी कार्यकर्त्यांना केले, तसेच आवाहन सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी केले होते.

एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही, असे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. आॅस्ट्रेलियातील ५६ एक्झिट पोलचे निष्कर्ष चुकीचे निघाल्याची माहिती काँग्रेस नेते शशी थरूर यांनी दोनच दिवसांपूर्वी दिली. चंद्राबाबू नायडू यांनीही एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना केंद्रामध्ये काँग्रेसच्या आघाडीचे व आंध्र प्रदेशात तेलगू देसमचेच सरकार येईल, असा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, राजदचे तेजस्वी यादव या नेत्यांनीही एक्झिट पोलवर आपला विश्वास नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे खरे ठरते कीएक्झिट पोल खरे ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जवळपास सर्वच एक्झिट पोलनी रालोआला २८६ ते ३0८ जागा (स्पष्ट बहुमत) तर यूपीएला ११३ जागा, तर पक्षांना ११५ जागांचा अंदाज दिला आहे. यूपीए व अन्य पक्ष मिळून २२८ होतात. ही संख्या बहुमतास पुरेशी नाही.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल