शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

विरोधकांचा आरोप राजकीय हेतूनेच टीप : सदर बातमी आजच अंबडला पाठविणे अपेक्षित

By admin | Updated: March 19, 2016 00:02 IST

दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगी

दत्ता गायकवाड : रिझर्व्ह बॅँकेचे निकष पूर्ण केल्याने आठ शाखांना परवानगीनाशिकरोड : नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँकेने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध संस्थांकडून ११ पुरस्कार मिळाले आहे. व्यवसायात झालेली लक्षणीय वाढ व बॅँकेची झालेली चौफेर प्रगती याला नजरेआड करत विरोधी गटाच्या संचालकांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले असल्याचे प्रतिउत्तर बॅँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिले आहे. रिझर्व्ह बॅँकेकडून व्यापारी बॅँकेला आठ नवीन शाखा उघडण्याची परवानगी दिली आहे. याबाबत विरोधी गटाच्या पाच संचालकांनी नवीन शाखा उघडण्यास विरोध दर्शवून बॅँक नुकसानीच्या दिशेने वाटचाल करेल असा आरोप केला होता. याबाबत शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत बॅँकेने अद्ययावत डाटा सेंटर, रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या निर्धारित वेळेच्या आत पूर्ण केलेले कोअर बॅँकिंग, एटीएम सेंटर सुविधा या बाबींची पूर्तता केली. २००४ साली बॅँकेचा ढोबळ एनपीए ४९ टक्के असताना बॅँकेस १ कोटी २० लाख रुपयांचा तोटा झाला होता. रिझर्र्व्ह बॅँकेच्या निर्बंधामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बॅँकेला वाटचाल करावी लागली. विद्यमान संचालकांच्या कार्यकाळात बॅँकेच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होऊन बॅँकेने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याने बॅँकेने नवीन शाखांची परवानगी मागितली होती. नवीन शाखांसाठी रिझर्व्ह बॅँकेचे आवश्यक असलेले सीआरएआर १० टक्क्यापेक्षा जास्त, ढोबळ एनपीए ७ टक्क्यापेक्षा कमी व निव्वळ एनपीए ३ टक्क्यांपेक्षा कमी, गेल्या ४ वर्षांपैकी सलग ३ वर्षे बॅँक सतत नफ्यात असावी, मागील आर्थिक वर्षात सीआरआर / एसएलआर यांचे उल्लंघन नसावे. सशक्त अंतर्गत नियमन प्रणाली व संचालक मंडळात कमीत कमी दोन व्यावसायिक संचालकांची नेमणूक, बॅँक कोअर बॅँकिंग सोल्युशनने पूर्ण असावी, गेल्या तीन वर्षात आरबीआय कडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक दंड झालेला नसावा किंवा नियमांचा भंग केल्याबद्दल आरबीआयकडून ताकीद मिळालेली नसावी, हे सर्व निकष बॅँकेने पाळल्यानेच बॅँकेला नवीन शाखांना परवानगी मिळाल्याचे स्पष्टीकरण दिले. विरोधी संचालकांनी नवीन शाखा सुरू केल्यास बॅँकेची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ती चुकीची असून व्यवसायाच्या शाखा वाढल्या तरच व्यवसायाची भरभराट होते हे लक्षात घ्यायला हवे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, रंजना बोराडे, डॉ. डी. जी. पेखळे, श्याम चाफळकर, डॉ. प्रशांत भुतडा, मनोहर कोरडे, भाऊसाहेब पाळदे आदि संचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)