शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:34 IST

India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारे युद्ध तुर्तास टळले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन अण्वस्त्रधारी देश शस्त्रसंधीकडे वळले आहेत. पाकिस्तान नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आला आहे, परंतू भारत त्यास जशासतसे प्रत्यूत्तर देत आला आहे. सध्या भारत पाकिस्तानमध्ये हवाई युद्ध रंगले होते. ते थांबविण्यासाठी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या समकक्ष अधिकाऱ्यांना फोन केला होता. यावरची चर्चा आज होणार होती. ती अद्याप झालेली नाही. 

दोन्ही देशांचे डीजीएमओ आज दुपारी १२ वाजता हॉटलाईनवर बोलणार होते. परंतू, हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरवरून हायलेव्हल बैठक घेत असताना दुसरीकडे डीजीएमओंची पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी चर्चा होणार होती. परंतू, ती काही कारणास्तव होऊ शकली नाही.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही चर्चा होण्याची अपेक्षित आहे. या चर्चेत तिसरा देश सहभागी होणार नाहीय. या बैठकीत युद्धविराम कायम ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ शांतता राखण्यासाठी चर्चा होऊ शकते. तसेच पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा मुद्दाही उपस्थित केला जाऊ शकतो. 

पाकिस्तानने युद्धविरामाची विनंती केल्यानंतर भारताने ती मान्य केली होती. परंतू, त्या रात्री पाकिस्तानने पुन्हा भारतावर हल्ला केला होता. रविवारी रात्री मात्र कोणताही आगळीक केली नाही. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक मोठी बैठक झाली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस, तिन्ही सैन्याचे प्रमुख आणि इतर अनेक अधिकारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यानंतर मोदी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Armyभारतीय जवान