शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 14:09 IST

Operation Mahadev : जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांची संपूर्ण 'कुंडली' आता समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सुलेमानी, अफगान आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. भारतीय लष्कर, केंद्रीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या ऑपरेशनमध्ये त्यांना ठार करण्यात आले.

संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान अमित शाह यांनी सांगितलं की, "या दहशतवाद्यांकडून ज्या गोळ्या मिळाल्या आहेत, त्याच गोळ्यांचा वापर पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारण्यासाठी करण्यात आला होता."

सुलेमान, जिब्रान-अफगान यांची संपूर्ण कुंडली

सुलेमान: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला सुलेमान हा पाकिस्तानी वंशाचा होता. लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होण्यापूर्वी सुलेमान पाकिस्तानी सैन्यात कमांडर होता. त्याला पहलगाम हल्ल्यापूर्वी पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीरमध्ये) प्रशिक्षण देण्यात आले होते. सुलेमान २०२२पासून जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय होता.

जिब्रान: जिब्रान हा लष्कर-ए-तैयबाचा 'ए-ग्रेड'चा कमांडर होता. पाकिस्तानी वंशाचा जिब्रान जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. गेल्या वर्षी सोनमर्ग येथे झालेल्या घटनेची जबाबदारीही जिब्रानने स्वीकारली होती.

अफगान: अफगान नावाचा दहशतवादीही पाकिस्तानचाच रहिवासी होता. अफगानही लष्कर-ए-तैयबाचा 'ए-श्रेणी'चा कमांडर होता. अफगाननेही पहलगाममध्ये लोकांवर गोळ्या झाडल्या होत्या. आरोप आहे की यानंतर अफगानने इतर साथीदारांसोबत तिथे जश्नही साजरा केला होता.

तिघांना कसे घेरले?

अमित शाह यांच्या मते, ज्या दिवशी कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची (CCS) बैठक होती, त्याच दिवशी या तिन्ही दहशतवाद्यांना बाहेर पडू द्यायचे नाही, असा निर्णय झाला होता. त्यानंतर लष्कराने तातडीने घेराबंदी सुरू केली.

लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी आधी या तिघांचे ठिकाण शोधले आणि त्यानंतर तिघांविरोधात ऑपरेशन सुरू केले. पावसामुळे हे दहशतवादी जास्त वेळ टिकू शकले नाहीत. तिन्ही दहशतवादी लष्कराच्या ऑपरेशनमध्ये मारले गेले. तिघांच्या जवळून पाकिस्तानी चॉकलेट्स आणि शस्त्रे सापडली आहेत.

एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये काय घडले होते?

पहलगामच्या बैसरन घाटात २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या ३ दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले होते. सरकारच्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारला होता. या घटनेची जगभरातून निंदा करण्यात आली होती.

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने ६-७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी ठिकाणांवर स्ट्राइक केला होता. संरक्षणमंत्र्यांच्या माहितीनुसार, या स्ट्राइकमध्ये १००हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

टॅग्स :terroristदहशतवादीPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान