शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'ऑपरेशन लोटस माझ्या मतदारसंघापर्यंत आलंय', अरविंद केजरीवालांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:21 IST

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी मतदार यादीवर आरोप केले. त्यावर आता निवडणूक आयोगाने भूमिका मांडली. 

Arvind Kejriwal Delhi Elections 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांची नाव वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले. अरविंद केजरीवाल सातत्याने हा मुद्दा मांडत असून, आता दिल्ली निवडणूक आयोगाने आरोपांना उत्तर दिले आहे. अंतिम मतदार यादी येईपर्यंत बदल होत राहतील, असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीची तारीखही सांगून टाकली. 

दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघून अरविंद केजरीवाल यांनी आधीपासूनच तयारी सुरू केली असून, उमेदवारही जाहीर केले आहेत. दिल्लीची सत्ता राखण्याचे आव्हान आम आदमी पक्षासमोर असून, केजरीवाल भाजपवर आरोप करताना दिसत आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, १५ डिसेंबर रोजी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळ्याची मोहीम सुरू झाली. ५००० मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दिले गेले. दुसरीकडे ७५०० मतदारांची नावे समाविष्ट करण्याबद्दल अर्ज दिले गेले. यामुळे माझ्या मतदारसंघात १२ टक्के मते बदलू शकतात. 

केजरीवालांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ६ हजार ८७३ इतकी आहे. २० ऑगस्ट ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आलेल्या बदलानंतर २९ ऑक्टोबर रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली.

निवडणूक आयोगाचे केजरीवालांना उत्तर

ज्या मतदार यादीचा उल्लेख अरविंद केजरीवाल करत आहेत, त्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने खुलासा केला. २९ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा आरखडा जारी करण्यात आला होता. त्याशिवाय २९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या अर्जांचा निपटारा २४ डिसेंबरपर्यंत करण्यात आला. १ जानेवारी २०२५ पर्यंत जे अर्ज येतील, त्यांचीही नावे समाविष्ट केली जाईल आणि अंतिम मतदार यादी ६ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने सांगितले. 

"ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघात"  

केजरीवालांनी आरोप केला होता की, ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचलं आहे. निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी ते आता मतदार यादीमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हेराफेरी लोकशाहीला कमकुवत करू शकते. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची हेराफेरी होऊ नये म्हणून त्यांनी लक्ष ठेवावे."

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल