शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन लोटस माझ्या मतदारसंघापर्यंत आलंय', अरविंद केजरीवालांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:21 IST

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी मतदार यादीवर आरोप केले. त्यावर आता निवडणूक आयोगाने भूमिका मांडली. 

Arvind Kejriwal Delhi Elections 2025: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मतदारांची नाव वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले. अरविंद केजरीवाल सातत्याने हा मुद्दा मांडत असून, आता दिल्ली निवडणूक आयोगाने आरोपांना उत्तर दिले आहे. अंतिम मतदार यादी येईपर्यंत बदल होत राहतील, असे स्पष्ट करत निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादीची तारीखही सांगून टाकली. 

दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार आहे. हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघून अरविंद केजरीवाल यांनी आधीपासूनच तयारी सुरू केली असून, उमेदवारही जाहीर केले आहेत. दिल्लीची सत्ता राखण्याचे आव्हान आम आदमी पक्षासमोर असून, केजरीवाल भाजपवर आरोप करताना दिसत आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला की, १५ डिसेंबर रोजी मतदार यादीतून मतदारांची नावे वगळ्याची मोहीम सुरू झाली. ५००० मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज दिले गेले. दुसरीकडे ७५०० मतदारांची नावे समाविष्ट करण्याबद्दल अर्ज दिले गेले. यामुळे माझ्या मतदारसंघात १२ टक्के मते बदलू शकतात. 

केजरीवालांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ६ हजार ८७३ इतकी आहे. २० ऑगस्ट ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आलेल्या बदलानंतर २९ ऑक्टोबर रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली.

निवडणूक आयोगाचे केजरीवालांना उत्तर

ज्या मतदार यादीचा उल्लेख अरविंद केजरीवाल करत आहेत, त्यावर दिल्ली निवडणूक आयोगाने खुलासा केला. २९ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा आरखडा जारी करण्यात आला होता. त्याशिवाय २९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या अर्जांचा निपटारा २४ डिसेंबरपर्यंत करण्यात आला. १ जानेवारी २०२५ पर्यंत जे अर्ज येतील, त्यांचीही नावे समाविष्ट केली जाईल आणि अंतिम मतदार यादी ६ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे आयोगाने सांगितले. 

"ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघात"  

केजरीवालांनी आरोप केला होता की, ऑपरेशन लोटस आता माझ्या मतदारसंघापर्यंत पोहोचलं आहे. निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी ते आता मतदार यादीमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हेराफेरी लोकशाहीला कमकुवत करू शकते. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची हेराफेरी होऊ नये म्हणून त्यांनी लक्ष ठेवावे."

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल