शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

फक्त 1 टक्के भारतीय कर भरतात, सरकारकडून माहिती उघड

By admin | Updated: May 1, 2016 19:23 IST

भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्केच लोक कर भरतात

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 1- भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्केच लोक कर भरतात. तसेच 5 हजार 430 लोक 1 कोटींहून अधिक कर भरत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. 2012-13च्या कर निर्धारणातून ही माहिती उघड झाली आहे. 
केंद्र सरकारनं कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी 15 वर्षांची कर संकलनाची माहिती जनतेसमोर खुली केली आहे. 2012-13ची माहिती आतापर्यंत समोर आली आहे. 31 मार्च 2012नंतर संपलेल्या आर्थिक वर्षात जवळपास 2.87 कोटी लोकांनी प्राप्तीकर परतावा जमा केलेला नाही. त्यातही 1.62 कोटी लोक करबुडवे निघाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष फक्त 1.25 कोटी लोकांनी कर भरला आहे. भारताची तेव्हाची लोकसंख्या पाहिल्यास तुलनेत हे प्रमाण फक्त 1 टक्केच आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 1.11 टक्के लोकांनी म्हणजे 89 टक्के लोकांनी 1.5 लाखांहून कमी कर भरला आहे. कराच्या रकमेची सरासरी 21 हजार कोटी इतकी दिसून आली आहे. एकूण 23 हजार कोटी इतकी करातून रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे. 5 हजार 430 लोकांनी 1 कोटींहून अधिक कर भरणा केला आहे. त्यातही 5 हजार लोकांनी 1 ते 5 कोटींपर्यंत कर भरला असल्याची माहिती समोर आली आहे. कर स्वरूपात लोकांकडून 8 हजार 907 कोटी जमा झाले आहेत. 
2015-16 या वर्षांत प्राप्तीकराच्या रकमेत नऊ पटीनं वाढ झाल्याचं या आकडेवारीवरून निदर्शनास येतं आहे. सरकारला आतापर्यंत करातून 2.86 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.