शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

रिलायन्स जिओच्या सीम कार्डवर कांदा, तूरडाळ आयुष्यभर मोफत

By admin | Updated: September 1, 2016 15:06 IST

यापुढच्या काळात फक्त डेटासाठी पैसे पडतील. बाकी सगळं फ्री मिळेल. आमचं तर उद्दिष्ट आहे कि रिलायन्सच्या ग्राहकांना दिवाळीला उटणंदेखील विकत घ्यायला लागू नये.

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओची 4जी सेवा लाँच करताना कर लो ग्राहक मुठ्ठीमे साठी ऑफर्सची लयलूट केली आहे. भागधारकांशी संवाद साधताना अंबानी यांनी आपल्या योजनांची जंत्री सादर केली, ज्यामध्ये काही योजना लाँच केल्या आहेत तर काही योजना भविष्यकाळात दाखल करण्यात येणार आहेत. अंबानींनी केलेल्या भाषणाचा व घोषणांचा गोषवारा...
यापुढच्या काळात फक्त डेटासाठी पैसे पडतील. बाकी सगळं फ्री मिळेल. आमचं तर उद्दिष्ट आहे कि रिलायन्सच्या ग्राहकांना दिवाळीला उटणंदेखील विकत घ्यायला लागू नये. सध्या सुरुवातीला देशातील सर्वसामान्यांची जी महागाईमुळे परवड होत आहे, ती टाळण्यासाठी जो ग्राहक वार्षिक 15 हजार रुपयांची जिओची सेवा घेईल, त्याला पुढील सेवा मोफत मिळतिल.
- अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, अनलिमिटेड मेसेज, महिन्याला पाच किलो तूरडाळ व 10 किलो कांदे मोफत.
सध्या रिलायन्सचं लक्ष्य 10 कोटी ग्राहकांचं आहे. ते साध्य झाल्यानंतर या, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर, पहिल्या 10 कोटी ग्राहकांपैकी 15 हजारांची सेवा घेतलेल्या ग्राहकांना लाइफटाइमसाठी दोन रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येईल.
प्ले स्टोअरमध्ये रिलायन्स खाओ नावाचा ऑप्शन असेल त्यामध्ये रिलायन्सच्या ग्राहकांना काय मोफत मिळेल व काय अत्यल्प दरात मिळेल याची माहिती दिलेली आहे. 
नजीकच्या काळात रिलायन्स पियो हा ऑप्शन सुरू करण्यात येणार असून त्यामध्ये गोमूत्र, कडुनिंबाचा रस, तुळशीचा रस, आवळ्याचा रस असे अनेक पर्याय देण्यात येणार असून त्यासाठी पतंजलीशी बोलणी सुरू आहेत.
विवाहमंडळांच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. जिओच्या तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकांना मोफत देण्यासाठी साथी पाओ ही सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे. संभाव्य जोडीदाराची संपूर्ण केवायसी रिलायन्सकडे असल्यामुळे फसवणुकीची शक्यता नाहीशी होणार आहे.
देशभरातले 10 कोटी ग्राहक रिलायन्सशी जोडली गेल्यानंतर पर्यटनक्षेत्रातल्या व्यक्तिंना पर्यटकांशी जोडणारी रिलायन्स जाओ ही सेवादेखील आपण देणार आहोत. त्यामुळे कुठल्याही मध्यस्थाखेरीज रिलायन्स जिओचे ग्राहक देशभरातल्या कुठल्याही पर्यटनस्थळी जाण्याचं बुकिंग फोनवर करू शकतात.
 
 
प्रिय भागधारकांनो, रिलायन्स जिओ तुम्ही सांगाल ती सेवा देण्यास सक्षम असेल. माझी तर अशी योजना आहे, की भविष्यकाळात लोकांचा पगार रिलायन्स जिओमध्येच जमा होईल. खाओ, पिओ, जाओ, साथी पाओ सारख्या असंख्य सेवा फक्त ग्राहकांनी उपभोगायच्या. पगाराप्रमाणे, आपोआप प्लॅन निवडला जाईल, प्लॅननुसार आपोआप सेवा ग्राहकाला मिळतिल, पैसे सिल्लक राहिलेच तर रिलायन्स इन्व्हेस्टमेंट त्या पैशांची रिलायन्स फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गुंतवणूक करेल.
जसजसं अंबानींचं भाषण रंगत होतं, तस तसा एकेकाचा बाजार उठत होता... आधी आयडिया सेल्युलर व भारती एअरटेलचं भागभांडवल 13 हजार कोटी रपयांनी घसरलं आणि नंतर देशभरातल्या कांदा व तूरडाळ व्यापाऱ्यांनी सामूहिक आत्महत्या करायचे इशारे दिले आहेत.
अंबानींच्या या मनसुब्यानंतर काही राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे:
नरेंद्र मोदी - माझं सरकार सगळ्यांशी एकाच न्यायाने वागेल. जे पर्याय रिलायन्ससाठी खुले आहेत, तेच पर्याय आयडिया, भारती एअरटेल वा अगदी शेतकऱ्यांसाठीही खुले आहेत.
अरविंद केजरीवाल - देशभरात एकहाती सत्ता रहावी आणि विरोधकच राहू नयेत यासाठी नरेंद्र मोदीच अंबानींच्या आडून रिलायन्स चालवतात, हा माझा आरोप आज सिद्ध झाला आहे. रिलायन्सचे 10 कोटी ग्राहक म्हणजे मोदींचे किमान 20 कोटी मतदार असा सरळ हिशोब आहे, या विरोधात आम्ही जंतरमंतर आंदोलन करणार.
शरद पवार - ते भाषण नीट वाचायला हवं. रिलायन्स तूरडाळ व कांदे आयात करणार आहेत की आपल्या शेतकऱ्यांकडून घेणार हे स्पष्ट झालेलं नाही. मला शंका येतेय की लोकांच्या मनात आपला हिंदुत्ववादी अजेंडा उतरवण्यासाठी RSS ने रचलेली ही खेळी आहे.
राज ठाकरे - कांदे व तूरडाळ मोफत वाटणार असतील तर आमच्या मराठी शेतकऱ्यांनी गोट्या खेळायच्या का? आणि मासे व कोंबडी खाणाऱ्यांनी काय घोडं मारलंय. अंबानी त्यांचा शाकाहार ग्राहकांच्या का गळ्यात मारतात... त्यांनी हवं तर रोज सकाळ संध्याकाळ गोमूत्र प्यावं, पण रिलायन्स पियो मध्ये बीअर का नाही? मी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून जिओवर बंदी आणण्यासाठी अध्यादेश काढण्याची विनंती करणार आहे.
उद्धव ठाकरे - किती मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे रे रिलायन्सच्या फोनचा?
राहूल गांधी - दलितांना रिलायन्स 4जी सेवा मोफत देणारेत की नाही ते आधी अंबानींनी जाहीर करावं. देशातल्या गरीबांना, मागासांना आणखी मागास ठेवण्याची आणि श्रीमंतांना आणखी श्रीमंत करण्याची नरेंद्र मोदींची जी खेळी आहे, त्याचाच एक भाग म्हणजे रिलायन्स जिओ आहे.
(ही वात्रटिका असून कृपया खरी बातमी समजू नये)