शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कांदा निर्यातीवरील बंदी १५ मार्चपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 05:33 IST

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष ठाकूरनवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा निर्यातीवर असलेली बंदी १५ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. देशात कांद्याची टंचाई निर्माण होऊन तो २०० रूपये किलोपर्यंत गेल्यावर सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशात कांद्याची उपलब्धता वाढून भाव नियंत्रणात राहायला मदत झाली. याचबरोबर सरकारने तुर्की, अफगाणिस्तानसह अनेक देशांतून कांदा आयात केला. परंतु, तेथील कांदा आकाराने मोठा होता, त्याला भारतीय कांद्याची चव नव्हती, त्याचा जास्त वापर हा सलाडसाठी होत असल्यामुळे भारतात या कांद्याचा फार उपयोग झाला नाही.सरकारचे म्हणणे असे आहे की, कांद्याचे मार्च महिन्यात जोरदार पीक झाले आहे. हे पीक गेल्या वर्षीच्या ४० लाख टन पिकाच्या जवळपास ४० टक्के जास्त आहे. यामुळे मंड्यांमध्ये त्यांची आवक जास्त झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती बºयाच स्थिर झाल्या. या पार्श्वभूमीवर निर्यातीवर आणखी बंदी तर्कसंगत नाही. एका अधिकाºयाने सांगितले की, किरकोळ बाजारात कांदा ३०-४० रूपये किलोपर्यंत आला आहे. हा भाव मार्चमधील कांद्याच्या पिकानंतर आणखी कमी होईल. याशिवाय भारतीय बाजारात कांद्याचीउपलब्धता आमच्या मागणीपेक्षा बरीच जास्त असेल.