शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

One Nation One Election विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? किती वेळ लागणार? काय असतील फायदे? जाणून घ्या सर्वकाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:26 IST

One Nation One Election Bill : वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेत मंजूर होऊन कायदाही झाला तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील.

One Nation One Election Bill : नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयक (One Nation One Election Bill) मंगळवारी संसदेत मांडण्यात आले. मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर हे विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. या विधेयकाला मंजुरी मिळावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. हे विधेयक आता जेपीसीकडे पाठवले जाईल. 

वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावर एकमत झाल्यानंतर देशभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील. यामुळे निवडणूक खर्च आणि प्रशासकीय भार कमी होईल जे राष्ट्रीय हिताचे असेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी होतात, ज्यामध्ये अनेक आव्हाने उभी राहतात. निवडणुका एकाच वेळी घेतल्या तर निवडणुकीचा खर्च एकदाच होईल, त्यामुळे पैसाही वाचेल आणि वेळही खूप वाचेल. तसेच, लोकांचा फायदा होईल आणि देशाचाही फायदा होईल.

वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक संसदेत मंजूर होऊन कायदाही झाला तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. तसेच, हा कायदा होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे हे विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहात दोन-तृतीयांश बहुमत मिळवावे लागेल आणि त्याशिवाय त्याला किमान १५ राज्यांच्या विधानसभेची मंजुरी घ्यावी लागेल. ही मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने हा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे हे विधेयक लागू होण्यासाठी खूप वेळ लागेल.

एवढेच नाही तर कायदा झाला तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक टप्प्यांत काम करावे लागणार आहे. निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची आवश्यकता भासणार असल्याने, त्यांच्या निर्मिती आणि चाचणीसाठी बराच वेळ लागणार आहे, त्यामुळे यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच, या विधेयकाअंतर्गत, संविधानाच्या ८३, ८५, १७२, १७४ आणि ३५६ या पाच प्रमुख कलमांमध्ये बदल करावे लागतील. 

या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी १० वर्षे लागू शकतात. कारण सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ २०१९ मध्ये संपणार आहे आणि त्यानंतर निर्वाचित लोकसभेच्या पहिल्या बैठकीदरम्यान याची माहिती दिली जाईल. त्यामुळे अशा स्थितीत निश्चितच १० वर्षे लागतील. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी ईव्हीएम आणि इतर संसाधनांची व्यवस्था करण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे घाईघाईने पावले उचलल्यास तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी उद्भवू शकतात.

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनlok sabhaलोकसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024Parliamentसंसद