शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 08:51 IST

समितीचे अध्यक्ष खा. पी. पी. चौधरी यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्र परिषदेत ही माहिती दिली. 

मुंबई : ‘एक देश, एक निवडणूक’ झाल्यास एकूण साडेचार लाख कोटी रुपयांची बचत होईल आणि मतदानाचा टक्का ८० ते ९० टक्केपर्यंत जाईल, असा अंदाज या संबंधीच्या संसदीय समितीने व्यक्त केला आहे. समितीचे अध्यक्ष खा. पी. पी. चौधरी यांनी शनिवारी मुंबईत आयोजित पत्र परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या या समितीने विविध राजकीय पक्ष, वित्तीय संस्था आणि राज्य सरकारचे ज्येष्ठ अधिकारी यांच्याशी दिवसभर चर्चा केली. सायंकाळी खा. चौधरी यांनी पत्र परिषदेत सांगितले, की साडेचार लाख कोटी रुपये केवळ देशाचेच वाचतील, असे नाही. सकल घरेलू उत्पादनाच्या १.६ टक्के म्हणजे ४ लाख ५० हजार कोटींचीबचत होईल, असा  अंदाज आहे. 

सर्व निवडणुका एकाच वेळी झाल्या तर एरवी वेगवेगळ्या निवडणुका झाल्याने मतदानाचा टक्का कमी असतो ते थांबेल. एकाच वेळी निवडणुका घेतल्या तर मतदारांचा उत्साह अधिक असेल त्यातून ८० ते ९० टक्क्यांपर्यंत मतदान होईल, ते सुदृढ लोकशाहीसाठी सकारात्मक असेल, असे चौधरी म्हणाले. या संसदीय समितीमध्ये खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीकांत शिंदे या महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज आमच्यासमोर मते मांडली, देशाच्या व्यापक हितासाठी आवश्यक असेल त्यानुसार निर्णय व्हावा, असे मत बहुतेकांनी व्यक्त केल्याचे खा. चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले. 

विशिष्ट कालावधीत एकाच वेळी निवडणुका ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे पंचायत ते लोकसभा निवडणुकीचे मतदान एकाच दिवशी घेणे असे नाही, तर एका विशिष्ट कालावधीत एकाच वेळी निवडणुका होतील, असे अपेक्षित असल्याचे खा. चौधरी यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकांवर मतदान घ्यावे, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी आजच्या सुनावणीत केली. मात्र, ही बाब आमच्या समितीच्या कार्यकक्षेत येत नाही, असे ते म्हणाले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपले जाते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होतो. वेगवेगळ्या निवडणुका घेतल्याने आचारसंहितेचा काळ मोठा होतो. अनेक धोरणात्मक निर्णय त्यामुळे अडतात. या बाबींचाही अभ्यास करण्यास संसदीय समितीने राज्य सरकारला सांगितले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

कर्ज परतफेडीचे प्रमाणही टिकेलरिझर्व्ह बँक, नाबार्ड, एलआयसी, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आदी वित्तीय संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संसदीय समितीसमोर सादरीकरण केले. बहुतेक संस्थांनी एक देश एक निवडणुकीचे स्वागत केले. मात्र, विशेषत: आपल्या ग्रामीण भागातील बँक कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून सूट द्यावी, असा त्यांचा सूर होता. राजकीय उद्देशाने दर निवडणुकीच्या आधी कर्जमाफी दिली जाते. मात्र, एकाच वेळी सर्व निवडणुका झाल्या तर ते टाळता येईल आणि त्यातून वित्तीय संस्कृती कर्ज परतफेडीचे प्रमाणही टिकेल, असे मत नाबार्डतर्फे व्यक्त करण्यात आले. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन