शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:10 IST

One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचा समावेश आहे.

One Nation One Election: केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या या समितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यसभेतील माजी विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, विधिज्ञ हरिश साळवे, माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. या समितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर प्रतिक्रिया दिली आहे. 

‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहीत समितीचे सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिला. अधीर रंजन चौधरी यांनी या समितीबाबत टीकाही केली. यातच आता, ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी सर्वोत्तम ते सर्व करू, अशी ग्वाही दिली आहे. 

‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करू

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबतच्या कामाची प्रक्रिया अद्याप अगदी प्राथमिक स्तरावर आहे. याविषयी सखोल आणि व्यापक विचार होण्याची गरज आहे. जे राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, तेच एक देश एक निवडणूक याबाबतीत केले जाईल. समिती अध्यक्षांकडून अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. समितीसाठी पथदर्शक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. व्यक्तिशः नेहमीच एका निवडणुकीच्या बाजूने मी असतो. मात्र, समिती दोन्ही बाजू विचारात घेण्यात येतील. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे हरिश साळवे यांनी नमूद केले. हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे यावर संसदेत चर्चा नक्कीच होऊ शकते, असेही साळवे यांनी सांगितले. 

दरम्यान, जे राजकीय क्षेत्रात आहेत, ते राजकारण करत आहेत. मात्र, भाजपला नेमके काय करायचे आहे, हे मला माहिती आहे. देशात राष्ट्रपती प्रणाली असावी, या मुद्द्यावरूनही अनेकदा चर्चा झाली आहे. विविध प्रकारच्या रिपोर्टमधून खरी परिस्थिती समजत असते. राजकारणामुळे सरकार बदलल्याचा विधानसभेवर कोणताही परिणाम होत नाही. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विधानसभा खंडित न करता सरकार बदलण्यात आले, असे हरिश साळवे यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनCentral Governmentकेंद्र सरकार