शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

“राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 10:10 IST

One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांचा समावेश आहे.

One Nation One Election: केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या या समितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यसभेतील माजी विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, विधिज्ञ हरिश साळवे, माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एन. के. सिंह, लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. या समितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर प्रतिक्रिया दिली आहे. 

‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहीत समितीचे सदस्यत्व स्वीकारण्यास नकार दिला. अधीर रंजन चौधरी यांनी या समितीबाबत टीकाही केली. यातच आता, ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी सर्वोत्तम ते सर्व करू, अशी ग्वाही दिली आहे. 

‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करू

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबतच्या कामाची प्रक्रिया अद्याप अगदी प्राथमिक स्तरावर आहे. याविषयी सखोल आणि व्यापक विचार होण्याची गरज आहे. जे राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, तेच एक देश एक निवडणूक याबाबतीत केले जाईल. समिती अध्यक्षांकडून अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. समितीसाठी पथदर्शक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. व्यक्तिशः नेहमीच एका निवडणुकीच्या बाजूने मी असतो. मात्र, समिती दोन्ही बाजू विचारात घेण्यात येतील. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे हरिश साळवे यांनी नमूद केले. हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे यावर संसदेत चर्चा नक्कीच होऊ शकते, असेही साळवे यांनी सांगितले. 

दरम्यान, जे राजकीय क्षेत्रात आहेत, ते राजकारण करत आहेत. मात्र, भाजपला नेमके काय करायचे आहे, हे मला माहिती आहे. देशात राष्ट्रपती प्रणाली असावी, या मुद्द्यावरूनही अनेकदा चर्चा झाली आहे. विविध प्रकारच्या रिपोर्टमधून खरी परिस्थिती समजत असते. राजकारणामुळे सरकार बदलल्याचा विधानसभेवर कोणताही परिणाम होत नाही. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विधानसभा खंडित न करता सरकार बदलण्यात आले, असे हरिश साळवे यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनCentral Governmentकेंद्र सरकार