शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:06 IST

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्यात रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची उपकरणे व आवश्यक साधन सामग्री तर हवीच, त्याचबरोबर कर्मचा-यांची कमतरता दूर करावी लागेल, ही बाब लक्षात आली.बैठकीत सुरक्षेबाबत जे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार ज्येष्ठ रेल्वे अभियंत्यांची १00 टक्के पदे भरली जाणार आहेत. येत्या ३ महिन्यांत सहायक स्टेशन मास्तर व गार्ड यांची भरती होईल. ‘ग्रुप सी’मधील ५0 टक्के रिक्त पदे रेल्वे भरती बोर्डाद्वारे व ‘ग्रुप डी’तील निम्मी पदे आरआरबी व निम्मी पदे रेल्वे भरती प्रकोष्ठामार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे ६५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरसीमार्फत तर ३५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरबीमार्फत केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेबाबत विभागवाद आडवा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी सेक्शन इंजिनीअर्स, ज्युनिअर इंजिनीअर्स, ट्रॅकमन, चौकीदार आदींशी नियमित संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. रेल्वे कार्यालये, वर्कशॉप्स, स्टाफ क्वार्टर्स, रनिंग रुम्स, रेस्ट हाउसेस, आरपीएफ बॅरॅक्स यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.’>समाधानाची बाबया निर्णयाचे आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सुरक्षा श्रेणीत दोन लाख पदे रिक्त आहेत. तथापि एक लाख पदे त्यात अशी आहेत की ज्यांच्याशिवाय रेल्वेचे दैनंदिन कामकाज चालूच शकत नाही. उशिरा का होईना रेल्वे व्यवस्थापनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटली आणि नव्या भरतीचे त्यांनी आदेश दिले ही समाधानाची बाब आहे. या भरतीनंतरही विविध झोनना सुरक्षा श्रेणीतील कर्मचा-यांची कमतरता भासल्यास, त्यांना रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचवले आहे. वित्त व कार्मिक विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करून महिन्याभरात रेल्वे पेन्शनरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधून काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.