शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:06 IST

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्यात रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची उपकरणे व आवश्यक साधन सामग्री तर हवीच, त्याचबरोबर कर्मचा-यांची कमतरता दूर करावी लागेल, ही बाब लक्षात आली.बैठकीत सुरक्षेबाबत जे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार ज्येष्ठ रेल्वे अभियंत्यांची १00 टक्के पदे भरली जाणार आहेत. येत्या ३ महिन्यांत सहायक स्टेशन मास्तर व गार्ड यांची भरती होईल. ‘ग्रुप सी’मधील ५0 टक्के रिक्त पदे रेल्वे भरती बोर्डाद्वारे व ‘ग्रुप डी’तील निम्मी पदे आरआरबी व निम्मी पदे रेल्वे भरती प्रकोष्ठामार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे ६५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरसीमार्फत तर ३५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरबीमार्फत केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेबाबत विभागवाद आडवा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी सेक्शन इंजिनीअर्स, ज्युनिअर इंजिनीअर्स, ट्रॅकमन, चौकीदार आदींशी नियमित संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. रेल्वे कार्यालये, वर्कशॉप्स, स्टाफ क्वार्टर्स, रनिंग रुम्स, रेस्ट हाउसेस, आरपीएफ बॅरॅक्स यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.’>समाधानाची बाबया निर्णयाचे आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सुरक्षा श्रेणीत दोन लाख पदे रिक्त आहेत. तथापि एक लाख पदे त्यात अशी आहेत की ज्यांच्याशिवाय रेल्वेचे दैनंदिन कामकाज चालूच शकत नाही. उशिरा का होईना रेल्वे व्यवस्थापनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटली आणि नव्या भरतीचे त्यांनी आदेश दिले ही समाधानाची बाब आहे. या भरतीनंतरही विविध झोनना सुरक्षा श्रेणीतील कर्मचा-यांची कमतरता भासल्यास, त्यांना रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचवले आहे. वित्त व कार्मिक विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करून महिन्याभरात रेल्वे पेन्शनरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधून काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.