शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

रेल्वेमध्ये एक लाख कर्मचा-यांची भरती, अपघातांनंतर मंत्रालयाला आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:06 IST

वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण असल्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सुरक्षा श्रेणीतल्या रिक्त जागांवर १ लाख कर्मचा-यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांच्यात रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची उपकरणे व आवश्यक साधन सामग्री तर हवीच, त्याचबरोबर कर्मचा-यांची कमतरता दूर करावी लागेल, ही बाब लक्षात आली.बैठकीत सुरक्षेबाबत जे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार ज्येष्ठ रेल्वे अभियंत्यांची १00 टक्के पदे भरली जाणार आहेत. येत्या ३ महिन्यांत सहायक स्टेशन मास्तर व गार्ड यांची भरती होईल. ‘ग्रुप सी’मधील ५0 टक्के रिक्त पदे रेल्वे भरती बोर्डाद्वारे व ‘ग्रुप डी’तील निम्मी पदे आरआरबी व निम्मी पदे रेल्वे भरती प्रकोष्ठामार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे ६५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरसीमार्फत तर ३५ हजार कर्मचा-यांची भरती आरआरबीमार्फत केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, रेल्वे सुरक्षेबाबत विभागवाद आडवा येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिका-यांनी सेक्शन इंजिनीअर्स, ज्युनिअर इंजिनीअर्स, ट्रॅकमन, चौकीदार आदींशी नियमित संवाद साधला पाहिजे. त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. रेल्वे कार्यालये, वर्कशॉप्स, स्टाफ क्वार्टर्स, रनिंग रुम्स, रेस्ट हाउसेस, आरपीएफ बॅरॅक्स यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.’>समाधानाची बाबया निर्णयाचे आॅल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिवगोपाल मिश्रांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, सुरक्षा श्रेणीत दोन लाख पदे रिक्त आहेत. तथापि एक लाख पदे त्यात अशी आहेत की ज्यांच्याशिवाय रेल्वेचे दैनंदिन कामकाज चालूच शकत नाही. उशिरा का होईना रेल्वे व्यवस्थापनाला आमच्या मागण्यांची दखल घ्यावीशी वाटली आणि नव्या भरतीचे त्यांनी आदेश दिले ही समाधानाची बाब आहे. या भरतीनंतरही विविध झोनना सुरक्षा श्रेणीतील कर्मचा-यांची कमतरता भासल्यास, त्यांना रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याबाबत सुचवले आहे. वित्त व कार्मिक विभागाने स्वतंत्र पथके नियुक्त करून महिन्याभरात रेल्वे पेन्शनरांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधून काढावा, अशा सूचना देण्यात आल्या.