शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 21:32 IST

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 30 - खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकही जखमी झाले, ज्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी 2 एप्रिल रोजी नोहट्टा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तर अन्य 14 जण जखमी झाले होते.
 
दरम्यान, दोन आठवड्यांनंतर शनिवारी काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, गुगल अॅप, युट्यूह, स्नॅपचॅट सारख्या साइटवर बंदी कायम आहे. 
 
दगडफेक करणा-यांना दहशतवादी कारवायांमध्ये  सहभागी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्यानं काश्मीर खो-यात यावर बंदी आणण्यात आली आहे. 
 
एकीकडे काश्मीर खोरे धुमसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. 
 
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे. 
 
 "स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला.