शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 21:32 IST

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 30 - खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकही जखमी झाले, ज्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी 2 एप्रिल रोजी नोहट्टा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तर अन्य 14 जण जखमी झाले होते.
 
दरम्यान, दोन आठवड्यांनंतर शनिवारी काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, गुगल अॅप, युट्यूह, स्नॅपचॅट सारख्या साइटवर बंदी कायम आहे. 
 
दगडफेक करणा-यांना दहशतवादी कारवायांमध्ये  सहभागी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्यानं काश्मीर खो-यात यावर बंदी आणण्यात आली आहे. 
 
एकीकडे काश्मीर खोरे धुमसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. 
 
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे. 
 
 "स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला.