शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 21:32 IST

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 30 - खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकही जखमी झाले, ज्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी 2 एप्रिल रोजी नोहट्टा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तर अन्य 14 जण जखमी झाले होते.
 
दरम्यान, दोन आठवड्यांनंतर शनिवारी काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, गुगल अॅप, युट्यूह, स्नॅपचॅट सारख्या साइटवर बंदी कायम आहे. 
 
दगडफेक करणा-यांना दहशतवादी कारवायांमध्ये  सहभागी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्यानं काश्मीर खो-यात यावर बंदी आणण्यात आली आहे. 
 
एकीकडे काश्मीर खोरे धुमसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. 
 
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे. 
 
 "स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला.