शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

By admin | Updated: April 30, 2017 21:32 IST

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 30 - खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकही जखमी झाले, ज्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी 2 एप्रिल रोजी नोहट्टा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तर अन्य 14 जण जखमी झाले होते.
 
दरम्यान, दोन आठवड्यांनंतर शनिवारी काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, गुगल अॅप, युट्यूह, स्नॅपचॅट सारख्या साइटवर बंदी कायम आहे. 
 
दगडफेक करणा-यांना दहशतवादी कारवायांमध्ये  सहभागी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्यानं काश्मीर खो-यात यावर बंदी आणण्यात आली आहे. 
 
एकीकडे काश्मीर खोरे धुमसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. 
 
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे. 
 
 "स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला.