शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

सहापैकी एका जोडप्याला होईना बाळ! हार्मोनमधील बदल, बदलती जीवनशैली ठरतेय मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 07:28 IST

२५ जुलै रोजी 'आयव्हीएफ' दिवस साजरा करण्यात येतो. वृद्धत्वाचे संकट निर्माण होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: हार्मोनमधील बदल आणि बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असून, भारतीय लोकसंख्येच्या वेगाला अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे वृद्धत्वाचे संकट निर्माण होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

२५ जुलै रोजी 'आयव्हीएफ' दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर डॉ. अजय मुर्डिया यांनी सांगितले की, सध्या भारत सध्या एका मोठ्या संकटावर उभा आहे. यामुळे केवळ लाखो कुटुंबांनाच नाही तर देशाच्या भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय समतोल धोक्यात आला आहे.

२.७ कोटी जोडपी...गर्भधारणेचा असून, ती वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. सहा पैकी एका जोडप्याला या संकटाचा सामना करावा लागत असून, यामुळे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर दूरगामी परिणाम होत आहेत.राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य • सर्वेक्षणानुसार, प्रजनन दर शहरी भारतात १.६ आणि ग्रामीण भागात २.१ आहे. २०५० पर्यंत, भारताचा प्रजनन दर १.२९ पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, जो २.१ च्या दरापेक्षा खूपच कमी आहे, याचा अर्थ कामकरी लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे, असे मुर्डिया यांनी माहिती देताना सांगितले.२२.५%महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ला सामोरे जावे लागत आहे.

सरकारने काय करावे?सरकारने वंध्यत्वाला राष्ट्रीय आरोग्यामध्ये प्राधान्य देण्याची गरज असून, विशेषतः ग्रामीण भागात आयव्हीएफ पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायला हवी. सरकारने आरोग्य योजनांतर्गत 'आयव्हीएफ'ची सुविधा मोफत देणे आवश्यक असल्याचे मुर्डिया यांनी म्हटले आहे. 2021 मध्ये सरकारने एआरटी व सरोगसी कायदा मंजूर केला आहे. यात एआरटीची नोंदणी, देखरेख व संचालन केले जाते.

भारतात सध्या तरुणांची लोकसंख्या अधिक असल्याचा अभिमान बाळगला जात असताना वृद्ध लोकसंख्येसह वाढत्या वंध्यत्वाच्या दरामुळे इतर आशियाई देशांप्रमाणेच लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. - डॉ. अजय मुर्डिया

टॅग्स :WomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी