शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

सहापैकी एका जोडप्याला होईना बाळ! हार्मोनमधील बदल, बदलती जीवनशैली ठरतेय मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 07:28 IST

२५ जुलै रोजी 'आयव्हीएफ' दिवस साजरा करण्यात येतो. वृद्धत्वाचे संकट निर्माण होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: हार्मोनमधील बदल आणि बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत असून, भारतीय लोकसंख्येच्या वेगाला अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे वृद्धत्वाचे संकट निर्माण होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

२५ जुलै रोजी 'आयव्हीएफ' दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर डॉ. अजय मुर्डिया यांनी सांगितले की, सध्या भारत सध्या एका मोठ्या संकटावर उभा आहे. यामुळे केवळ लाखो कुटुंबांनाच नाही तर देशाच्या भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय समतोल धोक्यात आला आहे.

२.७ कोटी जोडपी...गर्भधारणेचा असून, ती वंध्यत्वाने ग्रस्त आहेत. सहा पैकी एका जोडप्याला या संकटाचा सामना करावा लागत असून, यामुळे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीवर दूरगामी परिणाम होत आहेत.राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य • सर्वेक्षणानुसार, प्रजनन दर शहरी भारतात १.६ आणि ग्रामीण भागात २.१ आहे. २०५० पर्यंत, भारताचा प्रजनन दर १.२९ पर्यंत घसरण्याचा अंदाज आहे, जो २.१ च्या दरापेक्षा खूपच कमी आहे, याचा अर्थ कामकरी लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे, असे मुर्डिया यांनी माहिती देताना सांगितले.२२.५%महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ला सामोरे जावे लागत आहे.

सरकारने काय करावे?सरकारने वंध्यत्वाला राष्ट्रीय आरोग्यामध्ये प्राधान्य देण्याची गरज असून, विशेषतः ग्रामीण भागात आयव्हीएफ पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायला हवी. सरकारने आरोग्य योजनांतर्गत 'आयव्हीएफ'ची सुविधा मोफत देणे आवश्यक असल्याचे मुर्डिया यांनी म्हटले आहे. 2021 मध्ये सरकारने एआरटी व सरोगसी कायदा मंजूर केला आहे. यात एआरटीची नोंदणी, देखरेख व संचालन केले जाते.

भारतात सध्या तरुणांची लोकसंख्या अधिक असल्याचा अभिमान बाळगला जात असताना वृद्ध लोकसंख्येसह वाढत्या वंध्यत्वाच्या दरामुळे इतर आशियाई देशांप्रमाणेच लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. - डॉ. अजय मुर्डिया

टॅग्स :WomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी