शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

मोदींच्या शंभर दिवसांत जुलूमशाही, अनागोंदी;  शून्य विकासाचा राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 03:03 IST

विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत अराजक, अनागोंदी, जुलूमशाहीचे दर्शन साºया देशाला झाले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या शंभर दिवसांत देशात काहीच विकास झाला नसून त्यानिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारचे उपरोधिक शैलीत अभिनंदन केले आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या शंभर दिवसांत देशाला आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे ही वस्तुस्थिती मोदी सरकारने आतातरी मान्य करावी.

वाहननिर्मिती उद्योग कधी नव्हे इतका संकटात सापडला आहे. असे प्रश्न उभे राहूनही भारताची अर्थव्यवस्था चीन, अमेरिकेपेक्षा उत्तम कामगिरी करीत असल्याचे ढोल मोदी सरकार बडवत आहे. गेल्या वर्षीपासून देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापन व दुर्लक्षामुळेच ही स्थिती ओढवली आहे. उद्योजक, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत केलेल्या विश्लेषणाची भाजपने खिल्ली उडवली. देशातील आठ क्षेत्रांचा विकासदर २ टक्क्यांहून कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास देशात आर्थिक मंदी नक्की येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव सध्या देशाला जाणवत आहे. आपल्यावर टीका करणाºया प्रसारमाध्यमांवर जरब बसविणे, लोकशाहीचे खच्चीकरण करणे ही मोदी सरकारची दुसºया कार्यकाळातील शंभर दिवसांची कामगिरी आहे.

हा तर कामगारांचा अपमान : प्रियांकामोदींच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचे साजरे होणारे सोहळे हा सध्या बिकट स्थितीत सापडलेल्या वाहननिर्मिती, वाहतूक, खाणक्षेत्रातील कामगारांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, आपले भवितव्य अंध:कारमय होत असल्याचे कामगारांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी