शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मोदींच्या शंभर दिवसांत जुलूमशाही, अनागोंदी;  शून्य विकासाचा राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 03:03 IST

विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या शंभर दिवसांत अराजक, अनागोंदी, जुलूमशाहीचे दर्शन साºया देशाला झाले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या शंभर दिवसांत देशात काहीच विकास झाला नसून त्यानिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारचे उपरोधिक शैलीत अभिनंदन केले आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, विरोधी पक्षांतील नेत्यांना अटक करून मोदी सरकार स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या शंभर दिवसांत देशाला आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे ही वस्तुस्थिती मोदी सरकारने आतातरी मान्य करावी.

वाहननिर्मिती उद्योग कधी नव्हे इतका संकटात सापडला आहे. असे प्रश्न उभे राहूनही भारताची अर्थव्यवस्था चीन, अमेरिकेपेक्षा उत्तम कामगिरी करीत असल्याचे ढोल मोदी सरकार बडवत आहे. गेल्या वर्षीपासून देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापन व दुर्लक्षामुळेच ही स्थिती ओढवली आहे. उद्योजक, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत केलेल्या विश्लेषणाची भाजपने खिल्ली उडवली. देशातील आठ क्षेत्रांचा विकासदर २ टक्क्यांहून कमी आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास देशात आर्थिक मंदी नक्की येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, डळमळीत झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव सध्या देशाला जाणवत आहे. आपल्यावर टीका करणाºया प्रसारमाध्यमांवर जरब बसविणे, लोकशाहीचे खच्चीकरण करणे ही मोदी सरकारची दुसºया कार्यकाळातील शंभर दिवसांची कामगिरी आहे.

हा तर कामगारांचा अपमान : प्रियांकामोदींच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचे साजरे होणारे सोहळे हा सध्या बिकट स्थितीत सापडलेल्या वाहननिर्मिती, वाहतूक, खाणक्षेत्रातील कामगारांचा अपमान आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, आपले भवितव्य अंध:कारमय होत असल्याचे कामगारांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी