शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 08:22 IST

. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एक राष्ट्र, एक निवडणूक ही उत्तम संकल्पना आहे. त्यामुळे उत्तम कारभार करण्यास मदत होईल, धोरण अंमलबजावणीतील शिथिलता टाळता येईल, विखुरलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण होऊन त्यांचा नीट वापर होऊ शकेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.

मुर्मू यांनी म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत बनविलेले कायदे रद्द करून तीन नवे व आधुनिक स्वरूपाचे कायदे लागू करण्यात आले आहेत. जुने कायदे वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक होते. ते दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय परंपरेला साजेसे नवीन कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने केला. तसेच एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास देशावर कमी आर्थिक ताण येईल. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारताचे संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातील तरतुदींमुळे भारताच्या विकासाला चालना मिळाली. भारतीय संविधान बनविण्याच्या समितीत १५ महिला सदस्यांचा सहभाग होता. त्यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. जगातील इतर देशांत महिलांना समान दर्जा देण्याबाबत नकारात्मक वातावरण होते. मात्र भारतात महिलांनी देशाचे भवितव्य प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी भारतातील लोकशाही व्यवस्थेला आकार दिला.

‘शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे अर्थव्यवस्था प्रभावी’राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर प्रभावी ठरली आहे. आर्थिक विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने काही योजना राबविल्या आहेत. सर्वसमावेशक धोरणे राबविणारा व नैतिकतेच्या पायावर उभा असलेला भारत निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी संविधान महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू