शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी मिळणार पगार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:19 IST

देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : देशभरात ‘वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, देशभरात सर्वत्र कामगारांचा पगार दर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशीच होणे आवश्यक आहे. खासगी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी हे हिताचे ठरेल.ते म्हणाले की, ‘वन नेशन-वन डे पे' योजनेसंदर्भातील कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही इच्छा आहे. सेंट्रल असोसिएशन फॉर प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्वच क्षेत्रामध्ये किमान समान वेतनासाठी काही नियमही बनविणार आहे. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अगदी प्रारंभापासूनच कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालीे. व्यापार प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी देशातील विविध क्षेत्रांकरिता सिंगल पेज मेकॅनिझम तयार केला आहे.>१३ कामगार कायद्यांचे विलीनीकरणसंतोष गंगवार यांनी सांगितले की, आॅक्युपेशनल सेफ्टी, आरोग्य व कामाच्या ठिकाणची स्थिती (ओएसएच) यासंदर्भातील कायदा लागू करणार आहे. त्यामध्ये वेतनाच्या मुद्द्याचाही अंतर्भाव आहे. या गोष्टींशी संबंधित १३ कामगार कायद्यांचे विलिनीकरण करून एकच कायदा बनविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना या कायद्यातील तरतुदींचा लाभ मिळू शकेल.