शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एक करोड दिलेच नव्हते : भद्रेची कबुली

By admin | Updated: February 17, 2016 02:00 IST

नागपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.

नागपूर : अजय राऊतला अपहरण केल्यानंतर आपण एक करोड काय एक दमडीही दिली नव्हती. त्याच्याकडून खंडणी उकळण्यासाठीच अपहरण आणि उधारीच्या रकमेचा कट रचण्यात आला होता,असे कुख्यात गुंड राजू भद्रे याने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे.
भद्रे सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. गेल्या ३०-३२ तासांपासून पोलीस भद्र्रेची खबरबात घेत आहे. पहिल्या १२ तासाच्या झाडाझडतीतच कुख्यात भद्रेने पोलिसांसमोर अजय राऊत अपहरण आणि खंडणी प्रकरणाच्या सुरुवातीपासून तो समाप्तीपर्यंतच्या घटनाक्रमाचा उलगडा केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार, क्रिकेट सट्ट्याच्या खयवाडी-लगवाडीत राऊत जुळला आहे. तो थेट गोव्याला कटिंग (उतारी) करतो. कॅसिनोचाही तो लकी जुगारी आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोट्यवधींची माया असल्याचे भद्र्रे टोळीला माहीत होते. राऊतच्या लहान भावाचा गेल्या वर्षी गेम झाला. त्यामुळे राऊत दहशतीत आहे. जीवे मारण्याचा धाक दाखविल्यास तो मोठी खंडणी देऊ शकतो, याची खात्री असल्यामुळे भद्र्रे आणि त्याचा राईट हॅण्ड कुख्यात दिवाकर कोतुलवारने कट रचला. त्याप्रमाणे आपल्या टोळीतील गुंडांच्या मदतीने कोतुलवारने राऊतचे दिवसाढवळ्या अपहरण केले. त्याला तीन तास मारहाण करून भद्र्रेच्या घरामागे असलेल्या मठात नेेले आणि तेथे त्याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी उकळली. यातील ७५ लाख हिराचंदानी आणि मुणोत या दोघांनी दिले तर एक करोड रुपये राजू भद्रेकडून उधार घेण्याचे दिवाकरने सुचविले होते. प्रचंड दहशतीत आलेल्या राऊतने भद्र्रेला फोन केला अन् ठरलेल्या कटानुसार भद्रेच्या भावाकडून पेपरची रद्दी भरलेली बॅग (एक करोड रुपये असल्याचे सांगून) दिवाकरने घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दागिने गहाण ठेवून राऊतने भद्र्रेकडे ५० लाख रुपये आणि त्यानंतर पुन्हा ५० लाख रुपये परत आणून दिले.
अशाप्रकारे आपण उधारीच्या नावाखाली एक दमडीही राऊतला दिली नव्हती. केवळ दिखावा केला होता, असे भद्रेने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात सांगितल्याची माहिती आहे. भद्र्रे २२ फेब्रुवारीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा असल्याचे पोलीस सांगतात.
---