शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मजुरांसाठी  ‘एक देश एक रेशन कार्ड’; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:27 IST

केंद्राने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात सर्व राज्यांना पुरेसा अन्नसाठा सबसिडीच्या दरात देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे; मात्र त्या योजनेसाठी योग्य व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अन्नधान्याचे वाटप करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कोणत्याही भागात स्थलांतरित झालेल्या मजुरांना त्यांच्याकडे असलेल्या रेशन कार्डावरून योग्य किमतीत अन्नधान्य मिळावे व त्यांना अन्नसुरक्षा लाभावी, हे उद्देश ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेमागे असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

केंद्राने म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात सर्व राज्यांना पुरेसा अन्नसाठा सबसिडीच्या दरात देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे; मात्र त्या योजनेसाठी योग्य व्यक्तींची ओळख पटवून त्यांना अन्नधान्याचे वाटप करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. रेशन कार्ड हे बायोमेट्रिक असणार असून, त्यामुळे त्याच्या धारकाची ओळख देशातील कोणत्याही भागात पटू शकेल. 

दिल्ली सरकारकडून दिशाभूल nकोरोना साथीचे संकट असतानाही ३२ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांतील ६९ कोटी लोकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले, अशी माहिती केंद्राने प्रतिज्ञापत्रात दिली. nएक देश एक रेशन कार्ड योजनेबाबत दिल्लीतील सरकार लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगढ, दिल्लीमध्येही ही योजना लवकरच लागू होईल, अशी आशाही केंद्र सरकारने व्यक्त केली.