शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

रस्ते अपघातांत दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू

By admin | Updated: December 4, 2015 02:55 IST

दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली. मोठ्या संख्येतील अपघातांमुळे दरवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या(जीडीपी) तीन टक्के एवढी आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेत महामार्गांच्या विकासासाठी एकूण ४,८३,००० कोटी रुपयांची गरज असून सुमारे १,७८,००० कोटी रुपयांचा निधी खासगी गुंतवणुकीतून उभारण्याची योजना आहे. ९५ टक्के महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी प्रश्न सोडविण्यात आले असून लवकरच काम सुरू होईल. प्रलंबित पाच टक्के प्रकल्पांची कामेही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनरेगाच्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरणपुढील वर्षी १ जानेवारीपासून मनरेगाच्या निधीचे हस्तांतरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. केरळमधून नव्या पद्धतीचा प्रारंभ केला जाणार आहे. योग्य लाभार्र्थींपर्यंत पैसा पोहोचविला जावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. मनरेगांतर्गत सुमारे ११ कोटी कामगारांच्या खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६५ टक्के खाती बँकांची तर उर्वरित पोस्ट खात्यांची आहेत. बनावट कामगार आणि नोंदणीकृत कामगारांच्या यादींचा गैरवापर टाळण्यासाठी ‘ई-मस्टर’ यंत्रणा आणण्यात आली आहे. यावर्षी १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन यंत्रणा लागू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)