शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 21:37 IST

Omicron Variant: कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात एक नवीन भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला चिंताजनक म्हटले आहे आणि सर्व देशांना सावध राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगितीचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यात केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडमधील 19 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे. ते म्हणाले की, मिझोराम, केरळ आणि सिक्कीममधील आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

याचबरोबर, 10 राज्यातील  27 जिल्ह्यांवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे, असे राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे. ते म्हणाले की, या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि कोविड -19 च्या नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. जर एखाद्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असेल किंवा संसर्गाचे प्रमाण वाढत असेल, तर कंटेनमेंट झोनच्या रुपरेषेनुसार स्थानिक नियंत्रण सुरू केले पाहिजे, असे राजेश भूषण म्हणाले.

रात्री कर्फ्यूसारख्या उपाययोजना राबविण्याच्या सूचनाज्या भागात संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे किंवा रुग्णालयांतील 60 टक्के खाटा कोविड-19 रुग्णांनी भरलेल्या आहेत किंवा आयसीयूमध्ये 60 टक्क्यांहून अधिक खाटा रुग्ण आहेत, तेव्हा रात्रीचा कर्फ्यू, लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध, गर्दीवर निर्बंध (सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सण संबंधित), विवाहसोहळे आणि अंत्यविधीमध्ये लोकांची उपस्थिती मर्यादित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत, असे राजेश भूषण म्हणाले.

याचबरोबर, कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर नियमित पावले उचलली जावीत, असेही राजेश भूषण यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन