शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

बाबो...! रेल्वेने काढलेली 1.39 लाख जागांवर भरती, 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले; मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 23:27 IST

गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता. 

देशात बेरोजगारी कितीय? जो तो उठतोय तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतोय. करोडो लोक बेरोजगार आहेत. अशातच रेल्वेने १.३९ लाख जागांसाठी नुकतीच भरती काढली होती. यासाठी २.३७ कोटी उमेदवारांचे अर्ज आले होते. यामुळे एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्याचे आणि त्यातून त्यांची निवड करण्याचे मोठे आव्हान रेल्वेला पेलावे लागले आहे. 

गेल्या पाच वर्षांत आणि चालू वर्षात ३०२५५० उमेदवारांची विविध गटातील ग पदांसाठी निवड करण्यात आली. खासदार एम व्ही सत्यनारायण यांनी रेल्वे मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता. 

यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे प्रस्थ आणि विस्ताराचे महत्व पाहता पदे रिक्त होणे आणि ती भरली जाणे ही एक सततची प्रक्रिया आहे. या भरती केल्या जातात. नुकतीच 1.39 लाख पदे भरण्यासाठी दोन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी २.३७ कोटी उमेदवार आले होते, असे मंत्र्यांनी सांगितले. 

नवीन तंत्रज्ञानाचा परिचय, कार्यप्रणाली, नवीन मालमत्तेची निर्मिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मनुष्यबळ नियोजनातील मंजूर पदांच्या संख्येचा सातत्याने आढावा घेण्याची गरज आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेjobनोकरी