शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:05 IST

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देजेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे.

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करुन, 'सिद्दीक कप्पन… उमर खालिद… कहीं और हैं’।'... असे ट्विट स्वराने केलंय. म्हणजेच उमर खालिद अन् सिद्दीक कप्पनला अद्याप जामीन मिळाला नसल्याकडे स्वराने लक्ष वेधले. स्वराच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात का? असा सवाल एका ट्विटर युजर्संने विचारला आहे. 

जेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे. तर, रिंकू नावाच्या एका ट्विटर युजर्सने, मुलगा शाहरुख खानचा असेल तर जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आणि मुलगा भाजपचा नेता असेल तर जामीन कसा मिळाला? असा खोचक टोला लगावला आहे. 

चित्रपट निर्माता आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कापडी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कुचलणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला जामीन मिळाला, पण हाथरस गँगरेप कव्हर करणारे पत्रकार सिद्दिकी कप्पन 1 वर्षांपासून तुरुंगातच आहे. तर, जयराज सिंह यांनी ट्विट करुन जामीनावर प्रश्न उपस्थित केला आहे. आशिष मिश्राला जामीन मिळाला, उमर खालीदला नाही, असे सिंह यांनी ट्विट केले आहे. 

लखीमपूर खेरी हिंसाचार काय

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करUmar Khalidउमर खालिदlakhimpur-pcलखीमपुर