शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

लखीमपूरप्रकरणी मंत्रीपुत्राला जामीन, स्वराने विचारला उमर खालिदचा सवाल, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:05 IST

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे.

ठळक मुद्देजेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे.

नवी दिल्ली - लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा(Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) लखनौ खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. 

उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा आज तुरुंगातून बाहेर येईल. तत्पूर्वीच मिश्रा याच्या जामीननंतर सोशल मीडियातून शेतकरी संघटनांनी जामीनविरोधात अपील करण्याचं म्हटलं आहे. तर, अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करुन, 'सिद्दीक कप्पन… उमर खालिद… कहीं और हैं’।'... असे ट्विट स्वराने केलंय. म्हणजेच उमर खालिद अन् सिद्दीक कप्पनला अद्याप जामीन मिळाला नसल्याकडे स्वराने लक्ष वेधले. स्वराच्या या ट्विटनंतर नेटीझन्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात का? असा सवाल एका ट्विटर युजर्संने विचारला आहे. 

जेव्हा एखादा निर्णय तुमच्या बाजुने येतो, तेव्हाच तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवता, संविधान आणि त्यावर चालणाऱ्या संस्थांवर सोयीनुसार विश्वास, असे एका युजर्संने म्हटले आहे. तर, रिंकू नावाच्या एका ट्विटर युजर्सने, मुलगा शाहरुख खानचा असेल तर जामीन मिळणे हा त्याचा अधिकार आहे. आणि मुलगा भाजपचा नेता असेल तर जामीन कसा मिळाला? असा खोचक टोला लगावला आहे. 

चित्रपट निर्माता आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कापडी यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कुचलणाऱ्या मंत्र्याच्या मुलाला जामीन मिळाला, पण हाथरस गँगरेप कव्हर करणारे पत्रकार सिद्दिकी कप्पन 1 वर्षांपासून तुरुंगातच आहे. तर, जयराज सिंह यांनी ट्विट करुन जामीनावर प्रश्न उपस्थित केला आहे. आशिष मिश्राला जामीन मिळाला, उमर खालीदला नाही, असे सिंह यांनी ट्विट केले आहे. 

लखीमपूर खेरी हिंसाचार काय

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणात आशिष मिश्रा याला जामीन मिळाल्याने आता याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी तिकोनिया निघासन विधानसभा मतदारसंघात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टेनीचा मुलगा आशिष याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :Swara Bhaskarस्वरा भास्करUmar Khalidउमर खालिदlakhimpur-pcलखीमपुर