शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

जुन्या कपड्यांची सर्वात मोठी बाजारपेठ दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 04:48 IST

जगभरात जुन्या कपड्यांच्या अनेक बाजारपेठा आहेत. अगदी काही शहरांत जुने कपडे विकणारी दुकानेही आहेत. ज्यांना नवे कपडे विकत घेणे शक्य होत नाही, ते या बाजारांत जातात आणि तिथून कपडे विकत घेतात.

जगभरात जुन्या कपड्यांच्या अनेक बाजारपेठा आहेत. अगदी काही शहरांत जुने कपडे विकणारी दुकानेही आहेत. ज्यांना नवे कपडे विकत घेणे शक्य होत नाही, ते या बाजारांत जातात आणि तिथून कपडे विकत घेतात. दिल्लीच्या रघुबीर नगरमध्ये असाच एक बाजार आहे, पण त्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, तो पहाटे २ वाजता सुरू होतो आणि सकाळी आठ वाजेपर्यंत चालतो. किमान पाच हजार जण आपल्याकडील जुने कपडे तिथे विकायला ठेवतात. म्हणजे तिथे पाच हजार स्टॉल आहेत, असेच म्हणता येईल. रात्री तिथे काहीसा अंधार असतो. त्यामुळे प्रत्येकाकडे हातात टॉर्च असतेच.हे कपडे त्यांच्याकडे कुठून येतात आणि विकणारे कोण असतात, असा प्रश्न पडू शकतो. अनेक वर्षांपूर्वी हजारो लोक गुजरातमधून दिल्लीत आले आणि इथेच स्थायिक झाले. ते बहुतांशी वाघरी समाजाचे आहेत. भारतातील अनेक शहरांमध्ये या समाजाचे लोक दिवसा भांडी घेऊ न निघतात. जुन्या कपड्यांच्या बदल्यात ते भांडी देतात. मराठीत ते ‘बोहारी’ म्हणूनही ओळखले जातात. कदाचित, ‘वाघरी’ या शब्दावरूनच ‘बोहारी’ हा शब्द आला असू शकेल. हीच मंडळी त्या बाजारात कपडे विकायला येतात. मुख्य म्हणजे त्यापैकी ७0 ते ८0 टक्के बायकाच असतात. त्यामुळे हा बायकांनी चालविलेला बाजारच म्हटला जातो.जुने कपडे घ्यायचे, ते दुरुस्त करायचे आणि कमी किमतीत विकायचे, असा हा व्यवहार असतो. त्या कपड्यांत शर्ट, पँट, जीन्स, सलवार खमीस, साड्या यापासून चपला, बूट वगैरेही असतात. ज्यांना नवे कपडे परवडत नाहीत, ते तिथे येतात आणि १0 ते १00 रुपयांत कपडे विकत घेतात, पण त्यातील काही कपडे चांगले असतात.अनेक जण काही काळ कपडे घालतात आणि मग कंटाळा आला म्हणून ते वापरायचे बंद करतात. असे चांगल्या स्थितीतील कपडे विकायला दिल्लीजवळच्या शहरांतील काही व्यापारीही तिथं येत असतात. ते असे कपडे स्वस्तात घेतात आणि थेट दुकानांत विकायला ठेवतात. हा बाजार दिल्लीत १९८८ साली सुरू झाला आणि तो वाढतच चालला आहे.या कपडे बाजारात गर्दी होत असल्याने अनेक चोरीच्या वस्तूही काही जण तिथे विकायला ठेवतात. चपला, बूट, घड्याळे, घरातल्या लहानसहान वस्तू तिथे विक्रीला असतात. यापैकी बºयाच बायका आणि पुरुष सकाळी घरी जातात. काही वेळ आरात करतात आणि मग पुन्हा जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी या व्यवसायाला लागतात. हे भारतातलं सर्वात मोठे जुन्या कपड्यांचे मार्केट आहे.