शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निवडणुकीपूर्वी बदल्या; महाराष्ट्रातील आदेश देशभर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:39 IST

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता.

नवी दिल्ली : निवडणुकीपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यांची त्याच लोकसभा मतदारसंघात नियुक्ती केली जाणार नाही, याची खातरजमा करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्यांना केल्या आहेत. 

 निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निवडणूक आयोगाच्या धोरणातील पळवाटांचा राज्य सरकारांकडून गैरफायदा घेतला जात होता. त्यामुळे आयोगाने धोरणात बदल करून या पळवाटा बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्य सरकारांनी अधिकाऱ्यांची त्याच लोकसभा मतदारसंघाजवळील जिल्ह्यात बदली केल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. त्याची गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले. जे अधिकारी त्यांच्या गृहजिल्ह्यात नियुक्त आहेत किंवा ज्यांचा एकाच जागेवरील कार्यकाळ तीन वर्षे किंवा त्याहून अधिक झाला आहे, त्यांची निवडणुकीपूर्वी बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे धोरण आहे.

दिखावा न करता योग्य पालन करावे... विद्यमान धोरणातील त्रुटी दूर करताना आयोगाने दोन मतदारसंघ असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सोडून उर्वरित राज्यांनी अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली केली आहे, त्यांची त्याच मतदारसंघात नियुक्ती होणार नाही याची खातरजमा करावी.

केवळ देखावा करू नये तर धोरणाचे योग्यरीत्या पालन करावे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस