शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ओडिशाच्या किनाऱ्याला तडाखा देणारा ‘नागाचा फणा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 03:39 IST

फनी चक्रीवादळ : आठ देश ठरवितात वादळांची नावे

मुंबई : ओडिशाच्या किनाऱ्यावर आदळलेल्या चक्रीवादळाला फोनी (फेनी, फॅनी वा फनी असाही त्याचा उच्चार केला जात आहे) नाव का देण्यात आले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंग्रजीतील फनी (म्हणजे गंमतीदार) वरून हे नाव दिले की काय, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण फोनी हे नाव बांग्लादेशाने दिले असून, बंगालीत नागाच्या फण्याला फोनी म्हणतात. त्यामुळे नागाच्या फण्याने ओडिशाच्या किनाऱ्याला तडाखा दिला, असेच म्हणता येईल.

चक्रीवादळांना नाव देण्याची एक पद्धत आहे. एवढेच नव्हे, तर कोणत्या देशाने कोणत्या चक्रीवादळाला नाव द्यायचे, हेही ठरले आहे. पाश्चिमात्य देशांनी फार वर्षांपूर्वी अशा चक्रीवादळांना नावे देण्यास सुरुवात केली. ताशी ६५ किलोमीटरहून अधिक वेगाच्या चक्रीवादळालाच नाव दिले जाते. अमेरिकेने अनेकदा महिलांची नावेही अशा चक्रीवादळांना दिली आहे. काही वेळा प्रादेशिक वैशिष्ट्यानुसारही ही नावे ठरवली जातात. चक्रीवादळाला दिलेल्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्यात येते. महासागरानुसार जे झोन तयार केले आहेत, त्या-त्या झोनमधील देशांनी चक्रीवादळाचे नाव सुचवायचे असते.

अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांना नाव देणे १९५३ साली सुरू झाले. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या सूचनेनुसार २00४ पासून चक्रीवादळांचे नामकरण करण्याची सुरुवात केली. या आठ देशांत भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड व श्रीलंका यांचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८ नावे दिली असून, त्यांची एकूण संख्या आहे. ६४. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवली होती. लहर या नावाचे चक्रीवादळ २0१३ साली आले होते.ओडिशा व आंध्र प्रदेशच्या किनाºयावर सर्वाधिक चक्रीवादळे धडकतात. गेल्या वर्षी ओडिशात आलेल्या चक्रीवादळाचे नाव तितली होते. त्याआधी २0१४ सालच्या चक्रीवादळाचे नाव होते हुडहुड, तर २0१३ साली आलेल्या चक्रीवादळाला फैलिन हे नाव देण्यात आले होते. त्याच वर्षीच्या एका चक्रीवादळाचे नाव होते हेलन. त्याआधी २0१0 साली आलेल्या चक्रीवादळाचे नाव गिरी होते. त्याआधी २00४ सालच्या चक्रीवादळांची नावे अग्नी व ओनिल अशी होती. याखेरीज नर्गिस, ऐला, माला अशी होती. आॅस्ट्रेलियातील एका चक्रीवादळाला मोनिका हे नाव देण्यात आले होते.

कसे होते चक्रीवादळ?चक्रीवादळाचे शीतोष्ण आणि उष्ण असे दोन प्रकार असतात. जेव्हा शीत कटिबंधातून येणारी थंड हवा आणि उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण हवा एकत्र होते, तेव्हा समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यालाच चक्रीवादळ असे म्हटले जाते. त्यांचा फटका प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या भागांना बसतो.

१९७७चे भयावह वादळआंध्र प्रदेशच्या किनाºयावर १९७७ साली भयावह चक्रीवादळ धडकले होते. त्यात किमान १0 हजार लोक मरण पावले होते. याखेरीज कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली होती. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या अवनीगड्डा, मछलीपट्टणम भागांत चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले होते.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळOdishaओदिशाwest bengalपश्चिम बंगाल