शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Odisha Train Accident: 'तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'; राहुल गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 19:26 IST

Odisha Train Accident: ओडिशात झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधत सातत्याने सरकारवर टीका करत आहेत.

Rahul Gandhi On Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातावरुन विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करत आहेत. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारला यासाटी जबाबदार धरले आहे. यातच आता काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विटद्वारे रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

"270 हून अधिक मृत्यू झाल्यानंतरही कोणी जबाबदारी घेतली नाही. मोदी सरकार अशा वेदनादायक अपघाताच्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. 

दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनीही केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांना घेरले. "भयानक रेल्वे अपघाताला 24 तासांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वोच्च पदांवर बसलेल्या लोकांची जबाबदारी मानवतावादी आणि नैतिक आधारावर ठरवायला नको का? रेल्वेतील रिक्त पदे आणि महत्त्वाच्या क्षेत्रात निधीची कमतरता यासाठी कोणाला जबाबदार धरणार?लालबहादूर शास्त्री, नितीशकुमार, माधवराव सिंधिया यांच्याप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको का ? " असे प्रियंका म्हणाल्या.

गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

काँग्रेसकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीयाआधी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांच्या ‘प्रचार मोहिमे’मुळे रेल्वेच्या सुरक्षेशी तडजोड झाल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले, "'नोव्हेंबर 1956 मध्ये अरियालूर ट्रेन दुर्घटनेनंतर लाल बहादूर शास्त्रींनी राजीनामा दिला होता आणि ऑगस्ट 1999 मध्ये गॅसेल ट्रेन दुर्घटनेनंतर नितीश कुमार यांनीही तेच केले होते. आता पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा राजीनामा घेणार का?"

LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

अपघाताचे कारण काय?इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदल हे या रेल्वे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. अपघाताचे कारण सिग्नलसाठी आवश्यक पॉइंट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमशी संबंधित असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे बोर्डाच्या सदस्य जया वर्मा सिन्हा यांनीही सिग्नलमध्ये अडचण आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले आहे.

रेल्वेकडून 10लाख मदतमृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी