शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

छा गये ओबामा!

By admin | Updated: January 28, 2015 05:30 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी देतानाच विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहण्यासाठी धार्मिक एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भारतीयांना दिला़ मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या सिरीफोर्ट आॅडिटोरियममध्ये ओबामांनी देशातील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले़ आपल्या ३० मिनिटांच्या उत्स्फूर्त भाषणात बराक ओबामांनी उपस्थितांचीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली़ अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका’ने भाषणाची सुरुवात केली होती़ या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करीत ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ इंडिया’ असे ओबामांनी म्हणताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला़ या भाषणात ओबामांनी धार्मिक स्वातंत्र्यासोबतच मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिला सुरक्षा आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक मुद्द्यांना हात घातला़ सर्व धर्म एकाच झाडाची फुले आहेत, या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण ओबामांनी केले़ येथे विविध जातीपंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि धार्मिक एकोपा कायम आहे, तोपर्यंत भारताचा विकास कुणीही रोखू शकत नाही, असे ओबामा म्हणाले़ > भारतीय सशस्त्र दलात महिलांचा सहभाग ही अविश्वसनीय बाब असून, माझ्या मनाला भावलेली एक चांगली बाब आहे. एखाद्या देशातील महिला प्रगती करतात, तेव्हाच तो देश यशस्वी होतो. - बराक ओबामा> गरिबी, तरुणाई आणि स्वप्नेगरिबांनाही स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे, असे सांगत ओबामांनी आपल्या भाषणात व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला हात घातला़ या वेळी आपल्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेखही त्यांनी केला़ ते म्हणाले, मी आणि मिशेल अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहोत़ शिष्यवृत्ती आणि शिक्षकांनी केलेले संस्कार या आधारावर आम्ही आज येथे आहोत़ माझ्या आयुष्यातही अनेक प्रसंग आलेत़ कातडीच्या रंगामुळे मला अनेकदा भेदभावाचे चटके सहन करावे लागले़ माझ्या आस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले़ भारतात एक चहा विकणारा पंतप्रधान झाला़ एका आचाऱ्याचा नातू राष्ट्रपती बनला़ अशा देशात तुम्ही राहता़ भारतात तरुणांची संख्या अधिक आहे आणि भारताचे तरुण देशाचे भविष्य घडवू शकतात़