शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

छा गये ओबामा!

By admin | Updated: January 28, 2015 05:30 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांच्या दौऱ्याची सांगता करून भारतवासीयांचा निरोप घेण्यापूर्वी आर्थिक सहकार्याची आणि मित्रत्वाची हमी देतानाच विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहण्यासाठी धार्मिक एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भारतीयांना दिला़ मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या सिरीफोर्ट आॅडिटोरियममध्ये ओबामांनी देशातील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले़ आपल्या ३० मिनिटांच्या उत्स्फूर्त भाषणात बराक ओबामांनी उपस्थितांचीच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली़ अमेरिकेतील शिकागो येथे धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका’ने भाषणाची सुरुवात केली होती़ या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करीत ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स आॅफ इंडिया’ असे ओबामांनी म्हणताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला़ या भाषणात ओबामांनी धार्मिक स्वातंत्र्यासोबतच मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिला सुरक्षा आणि भारत-अमेरिका संबंध अशा अनेक मुद्द्यांना हात घातला़ सर्व धर्म एकाच झाडाची फुले आहेत, या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वचनाचे स्मरण ओबामांनी केले़ येथे विविध जातीपंथांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि धार्मिक एकोपा कायम आहे, तोपर्यंत भारताचा विकास कुणीही रोखू शकत नाही, असे ओबामा म्हणाले़ > भारतीय सशस्त्र दलात महिलांचा सहभाग ही अविश्वसनीय बाब असून, माझ्या मनाला भावलेली एक चांगली बाब आहे. एखाद्या देशातील महिला प्रगती करतात, तेव्हाच तो देश यशस्वी होतो. - बराक ओबामा> गरिबी, तरुणाई आणि स्वप्नेगरिबांनाही स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे, असे सांगत ओबामांनी आपल्या भाषणात व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला हात घातला़ या वेळी आपल्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेखही त्यांनी केला़ ते म्हणाले, मी आणि मिशेल अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहोत़ शिष्यवृत्ती आणि शिक्षकांनी केलेले संस्कार या आधारावर आम्ही आज येथे आहोत़ माझ्या आयुष्यातही अनेक प्रसंग आलेत़ कातडीच्या रंगामुळे मला अनेकदा भेदभावाचे चटके सहन करावे लागले़ माझ्या आस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले़ भारतात एक चहा विकणारा पंतप्रधान झाला़ एका आचाऱ्याचा नातू राष्ट्रपती बनला़ अशा देशात तुम्ही राहता़ भारतात तरुणांची संख्या अधिक आहे आणि भारताचे तरुण देशाचे भविष्य घडवू शकतात़