शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटली

By admin | Updated: March 5, 2015 22:57 IST

अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

सुरक्षेची चिंता : असोचेमचे सर्वेक्षणनवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीसोबत सुरक्षासंबंधी चिंता वाढल्याने गेल्या दोन वर्षात औद्योगिक क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून असोचेमने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार रात्रपाळी, उशिरापर्यंत थांबावे लागणे किंवा कार्यालय वा कामाचे ठिकाण शहराबाहेर असणे, अशा कारणांमुळे महिला कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षात २६.५ टक्क्यांनी घटली आहे.मागची दोन वर्षे अर्थव्यवस्थेत मंदी होती. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने संधीही कमी झाल्या. ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने सक्रिय भूमिका घेणे जरूरी आहे. २० ते ५० वर्षे वयोगटातील जवळपास १,६०० महिलांशी केलेल्या चर्चेच्या आधारे तयार करण्यात आलेला हा सर्वेक्षणात्मक अहवाल येथे एका कार्यक्रमात जारी करण्यात आला. यावेळी अलका लांबा, स्पाईस ग्रुपच्या कार्पोरेट समूह अध्यक्ष प्रीती मल्होत्रा आदींची उपस्थिती होती. दिल्लीला महिलांसाठी अनुकूल राजधानी करण्याची गरज आहे. तसेच महिलांमधील असुरक्षिततेची भावनाही दूर करणे जरूरी आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या अलका लांबा यांनी व्यक्त केले.कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रीती मल्होत्रा यांनी सांगितले.घर सांभाळून महिला नोकरीही करतात. आरामदायी कल्याणासोबत त्यांना सुरक्षा दिल्याशिवाय त्यांच्या लोकसंख्येचा फायदा घेता येणार नाही, असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यावेळी सांगितले.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४८ टक्के महिलांचे म्हणणे आहे की, निर्भया प्रकरणानंतरच्या दोन वर्षादरम्यान सुरक्षेची चिंता कमी होण्याऐवजी वाढली आहे. दिल्लीनंतर बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, लखनौतील स्थिती महिलांच्या दृष्टीने सुरक्षित नाही.राष्ट्रीय गुन्हा नोंदणी केंद्राच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार महिलांविरोधी गुन्ह्यांत १४.२ टक्क्यांनी दिल्लीचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरु (६.२ टक्के), कोलकात्याचा (५.७ टक्के ) क्रमांक लागतो.