शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

केंद्रशासित प्रदेशांची संख्या झाली नऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:23 IST

केंद्राचे असेल थेट नियंत्रण; विधानसभा मात्र तीनच ठिकाणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू व काश्मीर तसेच लडाख अशा दोन प्रदेशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा. म्हणजे ही दोन राज्ये होणार आणि ती केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखली जाणार. या राज्यांवर वा भागांवर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. त्यापैकी जम्मू-व काश्मीर या राज्यासाठी विधानसभा असेल. पण लडाखसाठी विधानसभा नसेल. या दोन्ही राज्यांमध्ये यापुढे नायब राज्यपाल असू शकतील. भारतात एकूण सात केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होते. आता त्यात आणखी दोन प्रदेशांची भर पडली आहे.सध्या दिल्ली, चंदीगड, पुडुच्चेरी, लक्षद्वीप, दादरा-नगरहवेली, अंदमान-निकोबार तसेच दीव व दमण हे केंद्रशासित प्रदेश असून, त्यापैकी दिल्ली व पुडुच्चेरीमध्ये विधानसभा आहे. अन्य केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा अस्तित्वात नाही. चंदीगड शहर हे केंद्रशासित प्रदेश असले तरी ते हरयाणा तसेच पंजाब अशा दोन राज्यांची राजधानीही आहे. आता लडाख व जम्मू-काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची नव्याने भर पडली आहे. याखेरीज देशात २९ राज्ये आहेत.देश स्वतंत्र झाला, तेव्हा सर्व भागांत ब्रिटिशांची सत्ता नव्हती आणि काही प्रदेश पूर्ण राज्य म्हणून आर्थिक व राजकीयदृष्ट्या स्थिर राहतील, अशी शक्यता नव्हती. त्यामुळे त्या भागांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्यासाठी १९५६ साली घटनादुरुस्ती करण्यात आली आणि राज्य पुनर्रचना कायद्यांद्वारे काही केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी अंदमान-निकोबार, लक्षद्वीप व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. दादरा-नगरहवेली (१९६१) तर पुडुच्चेरी व दीव-दमण हे १९६२ साली केंद्रशासित प्रदेश झाले; आणि त्यानंतर १९६६ साली चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. यापैकी पुडुच्चेरीवर फे्रंचांचे साम्राज्य होते; तर गोवा, दीव-दमण, दादरा-नगरहवेली यांवर पोर्तुगीजांचे साम्राज्य होते. हे भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करताना वेगवेगळे निकष लावण्यात आले. अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप हे भारताचे भाग असले तरी ती वेगळी बेटे आहेत आणि देशाच्या मूळ भूभागापासून दूर आहेत. मात्र ती सागरी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दादरा-नगरहवेली, दीव-दमण व पुडुच्चेरी येथील संस्कृती आसपासच्या राज्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. ती टिकविणेही महत्त्वाचे असल्याने ते भागही केंद्रशासित करण्यात आले. दिल्ली व चंदीगड यांचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. दिल्ली तर देशाची राजधानीच आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी