शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

केंद्रशासित प्रदेशांची संख्या झाली नऊ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 04:23 IST

केंद्राचे असेल थेट नियंत्रण; विधानसभा मात्र तीनच ठिकाणी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू व काश्मीर तसेच लडाख अशा दोन प्रदेशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा. म्हणजे ही दोन राज्ये होणार आणि ती केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखली जाणार. या राज्यांवर वा भागांवर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. त्यापैकी जम्मू-व काश्मीर या राज्यासाठी विधानसभा असेल. पण लडाखसाठी विधानसभा नसेल. या दोन्ही राज्यांमध्ये यापुढे नायब राज्यपाल असू शकतील. भारतात एकूण सात केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात होते. आता त्यात आणखी दोन प्रदेशांची भर पडली आहे.सध्या दिल्ली, चंदीगड, पुडुच्चेरी, लक्षद्वीप, दादरा-नगरहवेली, अंदमान-निकोबार तसेच दीव व दमण हे केंद्रशासित प्रदेश असून, त्यापैकी दिल्ली व पुडुच्चेरीमध्ये विधानसभा आहे. अन्य केंद्रशासित प्रदेशांत विधानसभा अस्तित्वात नाही. चंदीगड शहर हे केंद्रशासित प्रदेश असले तरी ते हरयाणा तसेच पंजाब अशा दोन राज्यांची राजधानीही आहे. आता लडाख व जम्मू-काश्मीर अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची नव्याने भर पडली आहे. याखेरीज देशात २९ राज्ये आहेत.देश स्वतंत्र झाला, तेव्हा सर्व भागांत ब्रिटिशांची सत्ता नव्हती आणि काही प्रदेश पूर्ण राज्य म्हणून आर्थिक व राजकीयदृष्ट्या स्थिर राहतील, अशी शक्यता नव्हती. त्यामुळे त्या भागांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. त्यासाठी १९५६ साली घटनादुरुस्ती करण्यात आली आणि राज्य पुनर्रचना कायद्यांद्वारे काही केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी अंदमान-निकोबार, लक्षद्वीप व दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. दादरा-नगरहवेली (१९६१) तर पुडुच्चेरी व दीव-दमण हे १९६२ साली केंद्रशासित प्रदेश झाले; आणि त्यानंतर १९६६ साली चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. यापैकी पुडुच्चेरीवर फे्रंचांचे साम्राज्य होते; तर गोवा, दीव-दमण, दादरा-नगरहवेली यांवर पोर्तुगीजांचे साम्राज्य होते. हे भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करताना वेगवेगळे निकष लावण्यात आले. अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप हे भारताचे भाग असले तरी ती वेगळी बेटे आहेत आणि देशाच्या मूळ भूभागापासून दूर आहेत. मात्र ती सागरी व्यूहरचनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दादरा-नगरहवेली, दीव-दमण व पुडुच्चेरी येथील संस्कृती आसपासच्या राज्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. ती टिकविणेही महत्त्वाचे असल्याने ते भागही केंद्रशासित करण्यात आले. दिल्ली व चंदीगड यांचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. दिल्ली तर देशाची राजधानीच आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी