शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कोरोना रुग्णांच्या संख्येत सप्टेंबरमध्ये ४१ % भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 06:58 IST

बळींचा आकडा वाढला : बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळून आला. त्यानंतर ते आतापर्यंतच्या कालावधीत एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ६३ लाखांवर पोहोचली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे ३३,३९० जणांचा बळी गेला. हे प्रमाण आतापर्यंत बळी गेलेल्या ९८ हजारांहून अधिक जणांच्या तुलनेत ३३.८४ टक्के आहे. याच महिन्यात २४,३३,३१९ जण कोरोनाच्या आजारातून बरे झाले. हे प्रमाण आतापर्यंत बरे झालेल्या ५२ लाखांहून अधिक लोकांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४६.१५ टक्के आहे. जगभरात कोरोनातून बरे झालेल्यांची सर्वात जास्त संख्या भारतात आहे. त्यानंतर ब्राझिल व मग अमेरिकेचा क्रमांक लागतो असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.असा गाठला रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्लाभारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून रुग्णसंख्येने १ लाखाचा पल्ला गाठण्यासाठी110दिवस लागले.त्यानंतर ५९ दिवसांत रुग्णसंख्या १० लाखांवर गेली. त्या काळात कोरोनाचा फैलाव आणखी वाढू लागला होता. रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाख होण्यास २१ दिवस, २० लाखांवरून ही संख्या ३० लाख होण्यास १६ दिवस लागले.त्यानंतरच्या १३ दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा ४० लाख झाला. त्यानंतरच्या ११ दिवसांत ५० लाख व त्यापुढील १२ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येने ६० लाखांचा पल्ला गाठला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या