शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

राज्यसभेत वाढेल भाजपाची संख्या, प्रकाश जावडेकर यंदा महाराष्ट्रातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:11 IST

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होत असून, या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपाचा लाभ होणार आहे. सभागृहात भाजपाच्या २६ जागा वाढतील, तर काँग्रेस ७ जागा जिंकू शकेल.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होत असून, या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपाचा लाभ होणार आहे. सभागृहात भाजपाच्या २६ जागा वाढतील, तर काँग्रेस ७ जागा जिंकू शकेल.या निवडणुकीत ६ केंद्रीय मंत्री व २ राज्यमंत्र्यांना भाजपा पुन्हा संधी देईल, परंतु ३ कॅबिनेटमंत्र्यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी इतर राज्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. अरुण जेटली गुजरातमधून तिसºयांदा राज्यसभेवर निवडले गेले. या खेपेस त्यांना उत्तर प्रदेशातून निवडून आणावे लागेल. भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार असले, तरी गुजरातमधून २ जागा गमवाव्या लागतील.विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मध्य प्रदेशऐवजी महाराष्ट्रातून पाठवावे लागेल. कारण मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपा नेत्यांच्या या वेळी प्राधान्याने विचार पक्षाला करावा लागणार आहे. त्यातच प्रकाश जावडेकर मूळचे पुण्याचेच आहेत. महाराष्ट्रातील तीनही जागा भाजपा सहजपणे जिंकेल.केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही भाजपाला विहारऐवजी उत्तर प्रदेशच्या कोट्यात आणावे लागणार आहे. बिहारमधून भाजपा १ जागा जिंकू शकेल. या जागेसाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद प्रबळ दावेदार आहेत. यंदा उत्तर प्रदेशातील १० पैकी ८ जागा जिंकणे, ही भाजपासाठी घसघशीत कमाई असेल. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत लवकरच ७४व्या वर्षांत प्रवेश करीत आहेत, तरी त्यांना मिळेल. कारण ते मध्य प्रदेशातील दलित नेते आहेत. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा पक्षश्रेष्ठींच्या खास मर्जीतील असल्याने, त्यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर आणण्यात अडचण नाही. त्यांच्याकडे भाजपाच्या संसदीय मंडळाचे सचिवपदाची जबाबदारी आहे.या निवडणुकीनंतर भाजपाची राज्यसभेतील एकूण संख्या ५८ वरून ६७ वर पोहोचेल. भाजपाला ५८ जागांपैकी २६ जागा मळतील. त्याचे १७ सदस्यच निवृत्त होणार आहेत. ९े जागा वाढणार असल्याने, भाजपाकडून कदाचित सचिन तेंडुलकर व अनू आगा यांना राष्ट्रपतीनियुक्त म्हणून पुन्हा संधी मिळू शकेल.भाजपाकडून राम माधव, मुरलीधर राव, अरुण सिंग व अनिल जैन या चेहºयांना संधी मिळू शकेल. भूपेंद्र यादव यांना राजस्थानातून तर अजय संचेती यांना महाराष्ट्रातून पुन्हा संधी मिळेल.काँग्रेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधून प्रत्येकी एक जागा आणि कर्नाटक व गुजरातमधून २ जागा जिंकू शकणार आहे. गुजरातमधून दुसरी जागा जिंकणे हे काँग्रेसला आव्हान ठरेल. लालू प्रसादांच्या पक्षाच्या मदतीने काँग्रेस बिहारमधून १ जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. बिहारमधून विरोधकांतर्फे शरद यादव यांना मिळू शकेल. काँग्रेसला राज्यसभेत नरेंद्र मोदींना तोडीस तोड देऊ शकेल, असा हिंदीभाषक नेताहवा आहे. राहुल गांधीही तसा विचार करीत आहेत.काँग्रेसचे बळ कमी होणारया निवडणुकीत राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ५४ वरून घटून ४९ वर येणार आहे. काँग्रेसचे १४ राज्यसभा खासदारांचा कार्यकाल संपत आहे. त्यातील ७ जणांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.३ राज्यांत घोडेबाजार?बिहार, कर्नाटक व उत्तर प्रदेशातील शिल्लक ३ जागा चर्चेत राहणार आहेत. तिथे स्वबळावर कोणताही पक्ष आपला उमेदवार निवडून आणू शकणार नसल्याने, तिथे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.प्रकाश जावडेकर यांना या खेपेस मध्य प्रदेशऐवजी महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर संधी द्यावी लागणार आहे.रविशंकर प्रसाद हे भाजपामधील प्रबळ दावेदार आहेत. भाजपाला त्यांना बिहारच्या एका जागेवर संधी द्यावीच लागेल.जे. पी. नड्डा पक्षश्रेष्ठींच्या खास मर्जीतले असल्याने हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर सहजपणे निवडून येतील.

टॅग्स :Parliamentसंसद