शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

1985 साली राजीव गांधी यांनी केलेल्या आसाम करारामध्ये होतं तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 16:04 IST

राज्यसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनआरसीचे बीज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली केलेल्या आसाम अॅकॉर्डमध्ये असल्याचे सांगितले. काँग्रेस जे करु शकले नाही ते आता आम्ही करत आहोत असे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे आसाम करार नक्की काय होता याची माहिती असणे आवश्यक आहे.

मुंबई- राष्ट्रीय नागरिकत्व मसुदा आसाममध्ये प्रकाशित झाल्यानंतर देशभरामध्ये त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. बांगलादेशातून आणि म्यानमारमधून भारतात घुसलेल्या लोकांचं करायचं काय यावर मते मांडली जात आहेत. 13 वर्षांपूर्वी बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे असे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक आपली भूमिका पूर्णपणे बदलली आहे. एनआरसीवर टीका करत सरकारविरोधी भूमिका घेत त्या एकापाठोपाठ एक विधाने करत सुटल्या आहेत. भारतामध्ये गृहयुद्ध पेटेल, रक्ताचे पाट वाहतील अशी भाषा त्या वापरु लागल्या आहेत.परवा राज्यसभेत बोलताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एनआरसीचे बीज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली केलेल्या आसाम अॅकॉर्डमध्ये असल्याचे सांगितले. काँग्रेस जे करु शकले नाही ते आता आम्ही करत आहोत असे त्यांनी यावेळेस सांगितले. त्यामुळे आसाम करार नक्की काय होता याची माहिती असणे आवश्यक आहे.

1970 च्या दशकाच्या शेवटी खासदार हिरालाल पटवारी यांच्या निधनामुळे आसामच्या मांगलडोई मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी त्याआधीच्या निवडणुकीपेक्षा अचानक मतदारांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. बांगलादेशातून हजारो लोकांनी घुसखोरी करुन मतदार यादीत प्रवेश मिळाल्याचे दिसताच ऑल आसाम स्टुडंट युनियन म्हणजे आसूने 8 जून 1979 रोजी 12 तासांचा संप घडवून आणला. या सर्व बाहेरच्या लोकांना पकडून देशाबाहेर हाकलावे अशी मागणी त्यांनी केली होती. आसाममध्ये घुसखोरांविरोधात पेटलेली ठिणगी आजही प्रज्वलितच आहे. आसाममध्ये 1979 पर्यंत घुसखोरांचा मुद्दा फारसा राजकीय पटलावर आलाच नाही. मात्र त्यानंतर याप्रश्नाला तोंड फुटले. यावर्षीच्या आंदोलनामुळेच आसाम गण परिषद निर्माण झाली.1980 ते 82 या कालावधीत केंद्र सरकारबरोबर आसामातील आंदोलकांच्या चर्चेच्या 23 फेऱ्या झाल्या. या चर्चांमध्ये 1951 ते 1961 या कालावधीत आलेल्या लोकांना सामावून घेणे आणि 1971 नंतर भारतात घुसलेल्या लोकांना परत पाठवण्यावर एकमत झाले. मात्र 1961 ते 1971 या कालावधीत आलेल्या लोकांचे काय करायचे याचा निर्णय झाला नाही.

1984मध्ये या दोन्हींमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. 15 ऑगस्ट 1985 रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम समझोत्यावर स्वाक्षरी केली. मार्च 1971 नंतर आलेल्या प्रत्येक घुसखोराला परत पाठवण्याचे त्यामध्ये निश्चित झाले व आसाममध्ये नव्या मतदारयादीनुसार 1985 साली निवडणुका घेण्यात आल्या.

आसाम समझोता काय आहे?1 जानेवारी 1966 पासून 24 मार्च 1971 पर्यंत आलेल्या परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांचे मतदार यादीतील नाव काढून टाकण्यात येईल आणि त्यांना 10 वर्षे मताधिकारापासून वंचित ठेवण्यात येईल; 25 मार्च 1971 नंतर आलेल्या परदेशी नागरिकांना भारताबाहेर पाठविण्यात येईल; असे निश्चित केले गेले. या करारामुळे आसामातील अशांतता कमी झाली आणि आंदोलन शमले. 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीAssam Gana Parishadअसाम गण परिषद