शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने टाकावी लागणार भंगारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 07:09 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत.

नवी दिल्ली : तुमच्याकडे १५ वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन असेल, तर ते तुम्हाला लवकरच भंगारात काढावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने यासंबंधीचा एक प्रस्ताव सरकारला सादर केला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत. शिवाय जुन्या वाहनांमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते.‘आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज २०२०-२१’ या कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी यांनी म्हटले की, आम्ही यासंबंधीचा प्रस्ताव दिला आहे. याला लवकरात लवकर मान्यता मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कार, बस आणि ट्रक अशा सर्व व्यावसायिक आणि खाजगी वाहनांना हा नियम लागू राहील. अर्थसंकल्प तोंडावर आलेला असतानाच गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन या धोरणाची घोषणा करू शकतात. यासंबंधीचा अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेईल. जुनी आणि अधिक प्रदूषण करणारी वाहने भंगारात निघाल्यास अर्थव्यवस्थेला फायदे होतील. गडकरी यांनी सांगितले की, या धोरणाला मान्यता मिळाल्यास भारत वाहन उद्योगाचे केंद्र बनेल.  भंगारात निघालेल्या वाहनांचे साहित्य पुनर्प्रक्रिया करून नव्या वाहनांच्या निर्मितीसाठी वापरले जाऊ शकते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा