शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

आता अलाहाबाद विद्यापीठातही वाद

By admin | Updated: March 9, 2016 05:04 IST

हैदराबाद विद्यापीठ, जेएनयू आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ या प्रकरणांत केंद्र सरकारवर टीका होत असतानाच अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष रिचा सिंह हिला त्रास देण्याचे

अलाहाबाद : हैदराबाद विद्यापीठ, जेएनयू आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ या प्रकरणांत केंद्र सरकारवर टीका होत असतानाच अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष रिचा सिंह हिला त्रास देण्याचे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ यांच्या विद्यपीठ भेटीला विरोध आणि कन्हैया कुमारच्या अटकेनंतर विद्यापीठ परिसरात घेतलेली सभा यामुळे आपल्याला लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप रिचा सिंह हिने केला आहे. राज्यसभेत जद (यु)चे के. सी. त्यागी आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी हा विषय उपस्थित केला असता, कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास दिला जाणार नाही आणि हे नेमके प्रकरण काय आहे, याची चौकशी केली जाईल, असे उत्तर केंद्र सरकारतर्फे देण्यात आले.तिला २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठात मिळालेल्या प्रवेशाच्या वैधतेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश कुलगुरू प्रोफेसर आर. एल. हंगलू यांनी गेल्या महिन्यात दिले होते. रिचा सिंहला राखीव जागेवर संशोधक विद्यार्थी म्हणून प्रवेश देण्यात आला, अशी तक्रार रजनीश कुमार नावाच्या प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्याने विद्यापीठाकडे केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले होते. विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या रिचा सिंह पहिलीच महिला अध्यक्ष आहे. गेल्या वर्षी रिचा सिंह यांनी केलेली निदर्शने भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी विद्यापीठ परिसराला भेट देऊन बंद पाडली होती. रिचा सिंह यांना त्यावर्षी ‘ग्लोबलायझेशन अँड डेव्हलपमेंट स्टडीज’ या विषयावरील संशोधनासाठी (पीएच.डी.) उपलब्ध असलेल्या दोनपैकी दिली गेलेली एक जागा राखीव वर्गातील विद्यार्थ्यासाठीच होती. मात्र, ती चूक निवड विद्यापीठ प्रशासनाची होती, असे चौकशी अहवालात उघड झाले ेआहे. कुलगुरूंनी दोनपैकी एक जागा रद्द केली तर रिचा सिंह यांना ती गमवावी लागेल, गुणवत्ता यादीत त्या दुसऱ्या स्थानावर आहेत. रिचा सिंह या डाव्या विचारांच्या संघटनेशी संबंधित असून, ती वसतिगृहाचे नियम पाळत नसल्याचे रजनीश कुमारने तक्रारीत म्हटले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शाखेचे गेल्या वर्षी विद्यापीठ परिसरात उद््घाटन करण्यासाठी खासदार आदित्यनाथ येणार होते, तेव्हा त्याला रिचा सिंह यांनी विरोध केला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला अटक झाल्यानंतर रिचा सिंह यांनी तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. रिचा सिंह यांनी जानेवारीमध्ये विद्यापीठात आयोजित केलेल्या चर्चासत्राला विद्यापीठाने परवानगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)