शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

आता 'या' लोकांना मार्च 2022 पर्यंत मिळणार मोफत रेशन, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:01 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली: कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला(PM Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत रेशन मिळत राहील. मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा आहे. 

सुरुवातीला, ही योजना एप्रिल-जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा(NFSA) अंतर्गत 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना सरकार मोफत रेशन पुरवते. मोफत शिधापत्रिकाधारक शिधावाटप दुकानांमधून मिळणाऱ्या अनुदानित धान्यापेक्षा जास्त आहेत.

योजनेचा लाभ कोणाला आणि किती मिळतो?

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत, भारतातील सुमारे 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना दरमहा 5 किलो अधिक धान्य(गहू-तांदूळ) दिले जाते. देशातील ज्या नागरिकाकडे शिधापत्रिका उपलब्ध आहे, त्यांना या योजनेअंतर्गत दरमहा 5 किलो अतिरिक्त रेशन त्याच्या कोट्यातील रेशनसह मिळत आहे. पण, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार करू शकता

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि रेशन विक्रेते या योजनेअंतर्गत तुमच्या कोट्यात धान्य देण्यास नकार देत असतील तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल वर प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यावर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.याशिवाय, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही NFSA वेबसाइट https://nfsa.gov.in वर जाऊन मेल लिहून तक्रार नोंदवू शकता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार