शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

Mohan Bhagvat: आता पुढचा नंबर स्वामी विवेकानंदांचा; सावरकरांवरील टीकेवरून मोहन भागवतांचा 'इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 21:38 IST

Mohan Bhagwat On Veer Savarkar: एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते, असे मोहन भागवत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सावरकरांना बदनाम करण्याची मोहिम सुरु आहे. आजच्या काळात वीर सावरकर यांच्या बाबतच्या खऱ्या माहितीचा अभाव जाणवत असल्याचे भागवत म्हणाले. 

भागवत म्हणाले, आरएसएस आणि सावरकरांवर टीका-टिप्पणी केली जातेय. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांचा नंबर येईल. भारताला जोडण्यामुळे ज्याचे दुकान बंद होईल त्याला ते चांगले वाटणार नाही. असे जोडण्याच्या विचाराला धर्म म्हटले जाते. मात्र, हे धर्म जोडण्याचे आहे ना ही पूजा पद्धतीच्या आधारावर विभाजन करणारे. यालाच मानवता किंवा संपूर्ण जगाची एकता म्हटले जाते. वीर सावरकरांनी यालाच हिंदुत्व म्हटले आहे, असे भागवत म्हणाले. 

एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते. सावरकरांचे हिंदूत्व, विवेकानंदांचे हिंदूत्व हे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. हिंदूत्व एकच आहे, जे आधीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील, असे देखील भागवतांनी सांगितले. 

सैयद अहमद यांना मुस्लिम असंतोषाचे जनक म्हटले जाते. इतिहासात दारा शिकोह, अकबर झाले, पण औरंगजेब देखील होताच, ज्याने चाक उलट दिशेने फिरविले. अशफाक उल्लाह खान यांनी म्हटले होते, मेल्यानंतर जो पुढला जन्म मिळेल तो भारतात घेईन. अशा लोकांची नावे पुढे आली पाहिजेत, असेही भागवत यांनी सांगितले.

सावरकरांचे युग येतेय...संसदेच आज काय होत नाहीय, फक्त मारहाण होत नाहीय बाकी सारे होते. बाहेर येतात एकत्र चहा पितात, एकमेकांकडे लग्नांना जातात. इथे सर्व समान आहे, यामुळे विशेषाधिकाराची भाषा कोणी करू नये. सुरक्षा नीति चालेल, सुरक्षेची चर्चा होईल पण राष्ट्रनीतिच्या मागे. काही लोकांनुसार 2014 नंतर सावरकर युग येत आहे, हे बरोबर आहे. सर्वाची जबाबदारी आणि भागीदारी असेल, हेच हिंदुत्व आहे, असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत