शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Mohan Bhagvat: आता पुढचा नंबर स्वामी विवेकानंदांचा; सावरकरांवरील टीकेवरून मोहन भागवतांचा 'इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 21:38 IST

Mohan Bhagwat On Veer Savarkar: एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते, असे मोहन भागवत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सावरकरांना बदनाम करण्याची मोहिम सुरु आहे. आजच्या काळात वीर सावरकर यांच्या बाबतच्या खऱ्या माहितीचा अभाव जाणवत असल्याचे भागवत म्हणाले. 

भागवत म्हणाले, आरएसएस आणि सावरकरांवर टीका-टिप्पणी केली जातेय. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांचा नंबर येईल. भारताला जोडण्यामुळे ज्याचे दुकान बंद होईल त्याला ते चांगले वाटणार नाही. असे जोडण्याच्या विचाराला धर्म म्हटले जाते. मात्र, हे धर्म जोडण्याचे आहे ना ही पूजा पद्धतीच्या आधारावर विभाजन करणारे. यालाच मानवता किंवा संपूर्ण जगाची एकता म्हटले जाते. वीर सावरकरांनी यालाच हिंदुत्व म्हटले आहे, असे भागवत म्हणाले. 

एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते. सावरकरांचे हिंदूत्व, विवेकानंदांचे हिंदूत्व हे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. हिंदूत्व एकच आहे, जे आधीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील, असे देखील भागवतांनी सांगितले. 

सैयद अहमद यांना मुस्लिम असंतोषाचे जनक म्हटले जाते. इतिहासात दारा शिकोह, अकबर झाले, पण औरंगजेब देखील होताच, ज्याने चाक उलट दिशेने फिरविले. अशफाक उल्लाह खान यांनी म्हटले होते, मेल्यानंतर जो पुढला जन्म मिळेल तो भारतात घेईन. अशा लोकांची नावे पुढे आली पाहिजेत, असेही भागवत यांनी सांगितले.

सावरकरांचे युग येतेय...संसदेच आज काय होत नाहीय, फक्त मारहाण होत नाहीय बाकी सारे होते. बाहेर येतात एकत्र चहा पितात, एकमेकांकडे लग्नांना जातात. इथे सर्व समान आहे, यामुळे विशेषाधिकाराची भाषा कोणी करू नये. सुरक्षा नीति चालेल, सुरक्षेची चर्चा होईल पण राष्ट्रनीतिच्या मागे. काही लोकांनुसार 2014 नंतर सावरकर युग येत आहे, हे बरोबर आहे. सर्वाची जबाबदारी आणि भागीदारी असेल, हेच हिंदुत्व आहे, असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत