शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आता केजरीवालांचीही घोषणा! चंदीगढ, पंजाबमध्ये वेगळे लढणार; इंडिया आघाडी राहिलीच कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:41 IST

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता.

भाजप विरोधात मोर्चा उघडणाऱ्या इंडिया आघाडीचा सेनापतीच भाजपासोबत मांडी लावून बसला आहे. काँग्रेसच्या स्वार्थामुळे काही महिन्यांपूर्वी एकाच व्यासपीठावर आलेले इंडिया आघाडीचे नेते वेगवेगळ्या दिशांना जाऊ लागले आहेत. पहिले ममता बॅनर्जी, नंतर नितीशकुमार आता केजरीवाल. केजरीवालांनी आप चंदीगढ आणि पंजाबमध्ये वेगळी लढणार असल्याची घोषणा करून इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका दिला आहे. 

नुकतेच काही एजन्सींचे ओपिनिअन पोल आले आहेत. यानुसार पंजाबमध्ये आपला बऱ्यापैकी जागा मिळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. असे असताना त्याच्या दोन दिवसांनी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीपासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. सध्यातही ते दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आहेत. 

आप पंजाब आणि चंदीगढच्या १४ जागांवर स्वतंत्र उमेदवार देणार आहे. ट्विटर अकाऊंटवर केजरीवाल यांनी व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. पंजाबच्या 13 आणि चंदीगडच्या 1 जागेवर आप एकटाच लढणार आहे. झाडूचे बटण दाबा आणि 'आप'ला 14 पैकी 14 जागा जिंकू द्या, अशी मी विनंती करत असल्याचे केजरीवाल म्हणाले आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता. आता त्याला केजरीवालांकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे इंडिया आघाडी बऱ्याच राज्यांत नाहीच अशी स्थिती झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील सपाने काँग्रेसला जागा जाहीर करून टाकल्या आहेत. तिथेही नाराजी आहे. नाही म्हणायला दक्षिणेत आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत तेथील स्थानिक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी आहेत.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी