शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

आता लक्ष आपच्या आश्वासन पूर्ततेकडे

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीत अफाट विजय प्राप्त करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मतदारांना नेमकी कुठली आश्वासने दिली होती याचा ऊहापोह या निकालाच्या निमित्ताने होतो आहे. कारण ही आश्वासनेच आपच्या यशाचे गमक आहे,असेही म्हणता येईल. त्यामुळेआता सत्तेत आल्यानंतर पक्ष दिलेल्या वचनांची कशी पूर्तता करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...


नवी दिल्ली- दिल्ली निवडणुकीत अफाट विजय प्राप्त करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने मतदारांना नेमकी कुठली आश्वासने दिली होती याचा ऊहापोह या निकालाच्या निमित्ताने होतो आहे. कारण ही आश्वासनेच आपच्या यशाचे गमक आहे,असेही म्हणता येईल. त्यामुळेआता सत्तेत आल्यानंतर पक्ष दिलेल्या वचनांची कशी पूर्तता करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आपचा १५ सूत्री वचननामा
१.दिल्ली जनलोकपाल विधेयक
भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकार देणारे दिल्ली जनलोकपाल विधेयक.
२. स्वराज विधेयक
जनतेच्या हाती सत्ता सोपविण्याची तरतूद असलेले स्वराज विधेयक. स्थानिक जनतेचे दैनंदिन जीवन प्रभावित करणारे सर्व निर्णय नागरिक घेतील आणि सचिवालयामार्फत त्यांची अंमलबजावणी होईल.
३. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा
दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. याअंतर्गत डीडीए, एमसीटी आणि दिल्ली पोलीस आदी स्थानिक प्रशासनिक संस्था नवनिर्वाचित दिल्ली सरकारला जबाबदार राहतील.
४. विजेची बिले निम्म्यावर
आपतर्फे कॅगला डिसकॉमचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले जाईल. तसेच कंपनीतर्फे अवाजवी दरवाढ केली जात असल्याकडे लक्ष वेधून विजेचे दर निम्म्यावर आणले जातील.
५.डिस्कॉम पोर्टेबिलिटी
वीज ग्राहकांना वीज पुरवठादार कंपनी निवडीचा अधिकार दिला जाईल. यामुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होण्यासोबतच वीज दरही कम होतील,असे आपचे म्हणणे आहे.
६.दिल्लीला सोलर सिटी बनविणार
अक्षयऊर्जा आणि ऊर्जेचे इतर पर्यायी स्रोत निर्मितीला प्राधान्य.
७. पाण्याचा अधिकार
दिल्लीकरांना वाजवी दरात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविणार. हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.
८. मोफत पाणी
प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला २० किलो लिटर्स (२०,००० लिटर्स) पाणी मोफत दिले जाईल. परंतु पाण्याचा वापर २० किलोलिटर्सच्यावर गेल्यास मात्र पूर्ण बिल भरावे लागणार. वार्षिक १० टक्के दरवाढीचा नियम रद्द केला जाईलआणि ही दरवाढ विचारविनिमयानंतर केली जाईल.
९. यमुनेचे पुनरुज्जीवन
शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आवश्यक क्षमतेच्या प्रकल्पाची निर्मिती.
१०. सार्वजनिक स्वच्छतागृहे
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये दीड लाख आणि सार्वजनिक ठिकाणी ५०,००० स्वच्छतागृहे बांधणार. यापैकी एक लाख स्वच्छतागृहे महिलांसाठी असतील.
११. नवीन शाळा
दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक बालकाला सहजपणे दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ५०० नवीन शाळा सुरू करणार. यात प्रामुख्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणावर भर असेल.
१२. नवीन महाविद्यालये
दिल्लीतील खेडेगावांच्या सहभागाने शहरालगतच्या परिसरात दिल्ली प्रशासनाच्या अंतर्गत २० नवीन महाविद्यालयांची स्थापना.
१३. शुल्क नियमन
खासगी शाळांमधील शुल्काचे नियमन करण्यासोबतच कॅपिटेशन फी पूर्णत: रद्द केली जाईल.
१४. ई गव्हर्नन्स
सर्व शासकीय सेवा आणि अर्ज ऑनलाईन उपलब्ध केले जातील. याशिवाय सरकारचे प्रकल्प, त्यांचा प्रगती अहवाल, अकाऊंटस् आदींची माहितीही ऑनलाईन मिळेल.
१५. स्मार्ट दिल्ली
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात मोफत वाय-फाय. शिवाय डीटीसीच्या बसेस, बस स्थानके आणि इतर गर्दीच्या ठिकाणांवर १०,००० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.