शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सेवा शुल्क भरणं ग्राहकांच्या मर्जीवर

By admin | Updated: January 2, 2017 19:55 IST

हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाशुल्क भरणे ग्राहकांसाठी ऐच्छिक असल्याचे केंद्रीय ग्राहकविषयक  खात्याने सांगितले आहे. त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये सेवाशुल्क भरणे हे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून असेल. 
याबाबत केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की,  अनेक हॉटेल, रेस्टॉरंटमधून मनमानी पद्धतीने सॆवाशुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही ठिकाणी टिप म्हणून  5 ते 20 टक्के रक्कम सेवाशुल्क म्हणून आकारली जात आहे. तसेच ही रक्कम भरण्यासाठी ग्राहकांवर जबरदस्ती केली जात आहे, जिचा सेवेशी काहीही संबंध नाही.    ग्राहक संरक्षण कायदा (1986) नुसार कुठलेही सामान, वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणे चुकीचे समजले जाते. तसेच त्यासंदर्भात तक्रारही करता येत होती. मात्र हा नियम सर्वसामान्य ग्राहकांना माहित नसल्याने हॉटेलमालकांकडून मनमानी पद्धतीने सेवाशुल्क आकारले जात होते. 
 दरम्यान, तक्रारी आल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडे स्पष्टिकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना या संघटनेने सेवाशुल्क भरणे हे पूर्णपणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे सांगितले. तसेच जर ग्राहक मिळालेल्या सेवेबाबत असमाधानी असेल, तर तो बिलातून सेवा शुल्क पूर्णपणे हटवू शकतो, असेही हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या उत्तरात म्हले होते. त्यानंतर ग्राहक न्यायालयाने कुठलेही हॉटेल ग्राहकांवर सेवाशुल्कासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. तसेच आपल्या प्रदेशातील कंपन्या, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना सूचित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले.