शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आता सेवा शुल्क भरणं ग्राहकांच्या मर्जीवर

By admin | Updated: January 2, 2017 19:55 IST

हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - हॉ़टेल, रेस्टॉ़रंटमध्ये ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाशुल्क भरणे ग्राहकांसाठी ऐच्छिक असल्याचे केंद्रीय ग्राहकविषयक  खात्याने सांगितले आहे. त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये सेवाशुल्क भरणे हे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून असेल. 
याबाबत केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की,  अनेक हॉटेल, रेस्टॉरंटमधून मनमानी पद्धतीने सॆवाशुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही ठिकाणी टिप म्हणून  5 ते 20 टक्के रक्कम सेवाशुल्क म्हणून आकारली जात आहे. तसेच ही रक्कम भरण्यासाठी ग्राहकांवर जबरदस्ती केली जात आहे, जिचा सेवेशी काहीही संबंध नाही.    ग्राहक संरक्षण कायदा (1986) नुसार कुठलेही सामान, वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणे चुकीचे समजले जाते. तसेच त्यासंदर्भात तक्रारही करता येत होती. मात्र हा नियम सर्वसामान्य ग्राहकांना माहित नसल्याने हॉटेलमालकांकडून मनमानी पद्धतीने सेवाशुल्क आकारले जात होते. 
 दरम्यान, तक्रारी आल्यानंतर ग्राहक मंत्रालयाने हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडे स्पष्टिकरण मागितले होते. त्याला उत्तर देताना या संघटनेने सेवाशुल्क भरणे हे पूर्णपणे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे सांगितले. तसेच जर ग्राहक मिळालेल्या सेवेबाबत असमाधानी असेल, तर तो बिलातून सेवा शुल्क पूर्णपणे हटवू शकतो, असेही हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या उत्तरात म्हले होते. त्यानंतर ग्राहक न्यायालयाने कुठलेही हॉटेल ग्राहकांवर सेवाशुल्कासाठी जबरदस्ती करू शकत नाही, असा निर्णय जाहीर केला आहे. तसेच आपल्या प्रदेशातील कंपन्या, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना सूचित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले.