शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

नववर्षातही नोटातंगी!

By admin | Updated: December 26, 2016 05:26 IST

नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस उरले असले, तरी चलनी नोटांचे छापखाने आणि

नवी दिल्ली : नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण होण्यास अवघे पाच दिवस उरले असले, तरी चलनी नोटांचे छापखाने आणि भारतीय रिझर्व बँकेला नवीन नोटांची पूर्तता करता येत नसल्याने, ३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. बँकांचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नववर्षातही हे निर्बंध कायम ठेवले जावेत, असे बँकांचेही मत आहे.अनेक बँका रोकडअभावी दर आठवड्याला २४ हजार रुपये देण्याच्या स्थितीत नाहीत. व्यक्तिश: किंवा व्यवसायासाठी पैसे काढण्याची मर्यादा २ जानेवारीपासून हटविण्यात आल्यास, मागणीनुसार बँकांना रक्कम देता येणार नाही. रोकड स्थिती सुधारल्यानंतरच हे निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे, असे अनेक बँकांना वाटते, असे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ग्राहकांची व्यक्तिश: मागणी पूर्ण करणे बँकांना शक्य होत नाही. अशा स्थितीत सूक्ष्म मध्यम-लघु क्षेत्र आणि बड्या कंपन्यांना सेवा देणे कसे शक्य आहे. तेव्हा हे निर्बंध हळूहळू शिथिल करणेच उचित ठरेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.अलीकडेच, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनीही असेच संकेत दिले होते. जोवर बँकांत पुरेशी रोकड येत नाही, तोवर पैसे काढण्यावरील निर्बंध हटविले जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. बँक आणि ग्राहकांच्या भल्यासाठी हे निर्बंध आणखी काही काळ कायम राहतील, असे मत आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडेरेशनचे सरचिटणीस हरविंदर सिंग यांनीही व्यक्त केले आहे. नोटाबंदीनंतर बँक खात्यातून आठवड्याला २४ हजार रुपये, तर एटीएममधून दररोज अडीच हजार काढण्याची मर्यादा आहे. हे निर्बंध कधी हटविण्यात येतील, हे सरकार आणि रिझर्व बँकेनेही स्पष्ट केलेले नाही.किती नोटा बाजारात आणल्यानोटाबंदीनंतर ९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत बँकिंग प्रणालीत रिझर्व बँकेने ५.९२ लाख कोटींच्या नवीन नोटा आणल्या. चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटांचे मूल्य १५.४ लाख कोटी रुपये होते. रिझर्व बँकेच्या माहितीनुसार, १० डिसेंबरपर्यंत बँकेत जुन्या नोटांत १२.४ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.डिजिटल व्यवहार करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना करामध्ये सूट देण्याचा सरकारचा विचार आहे. ज्या व्यापाऱ्यांची उलाढाल दोन कोटी रुपयांपर्यंत आहे व ते डिजिटल व्यवहार करीत असतील, तर त्यांना आठ टक्क्यांऐवजी सहा टक्के दराने कर आकारला जाईल. आॅनलाइन व्यवहारासाठी थंब प्रिंटचीही सुविधाकमी पैशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. ते दिल्लीतील विज्ञान भवनात जनधन मेळ्यात बोलत होते.कॅशलेस अर्थव्यवस्थेचे लोकांना अधिकाधिक फायदे मिळावेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. ज्यांच्याकडे एटीएम कार्ड किंवा मोबाइल नाही, अशांना आॅनलाइन व्यवहारासाठी थंब प्रिंटची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कॅशलेस म्हणजे कमी कॅश, कॅश नाहीच, असे नाही. लकी ग्राहक, डिजिधन योजनांमुळे देशाला कॅशलेस करण्यात मोठी मदत होणार आहे. जगभरात आर्थिक अस्थिरता सुरू असताना भारत आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर आहे. असाही एक काळ होता, ज्या वेळी फक्त १ टक्का लोकांकडे मोबाइल होते. आज मात्र, जवळपास ९० टक्के लोकांकडे मोबाइल आहेत.बँकिंग सीस्टिममध्ये पैसा आल्यावर अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशाबाहेरील काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या संस्थांना संपूर्ण माहिती दिली आहे.- अरुण जेटली