शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

केवळ सैनिकांनीच नाही, तर नागरिकांनीही प्रत्युत्तर द्यावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:38 IST

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोनम वांग्चुक यांचे मत : चीनवर बहिष्काराची मोहीम भारतासाठी सिद्ध होईल वरदान

चीन : चीन आणि भारत यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपली काय जबाबदारी आहे? जेव्हा सीमेवर तणाव निर्माण होतो तेव्हा सामान्य नागरिक हा विचार करून झोपी जातो की, सैनिक याला प्रत्युत्तर देतील; पण आज मी लोकांना सांगू इच्छितो की, यावेळी केवळ सैनिकांचे उत्तर नव्हे, तर नागरिकांचेही प्रत्युत्तर यायला हवे, अशा शब्दांत शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रयोगकर्ते सोनम वांग्चुक यांनी आपले विचार व्यक्त केले.

वांग्चुक म्हणाले की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि देशांच्या दुसऱ्या शहरांतील लोक काय करू शकतात? यासाठी आम्हाला अगोदर चीनच्या कुरापती आणि ते असे का करीत आहेत, ते समजून घ्यावे लागेल. हे केवळ भारतासोबत होत नाहीय. चीन गत काही आठवड्यांपासून दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, र्तैवान आणि आता हाँगकाँगसोबत कुरापती काढत आहे. मला असे वाटते की, एखाद्या देशाशी दुश्मनीपेक्षा ते आपल्या अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी असे करीत आहे. आज चीनला सर्वाधिक भीती आतून आहे. कारण, १४० कोटी लोक वेठबिगारांप्रमाणे काम करीत आहेत. ते नाराज होतील तेव्हा क्रांती होऊ शकते. त्याला चीन घाबरतो. कोरोनानंतर तेथे बेरोजगारी वाढली आहे. लोक नाराज आहेत. क्रांती होऊ शकते. सत्तापालट होऊ शकतो. त्यामुळे शेजाऱ्यांशी दुश्मनी करत जनतेला आपल्यासोबत घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चार वर्षे दुष्काळ आणि भूकमारी झाल्याने १९६२ मध्ये भारतासोबत चीनने लढाई केली होती.

जरा विचार करा आम्ही भारतीय उद्योजकांना मारून चीनच्या कपड्यापासून ते अन्य वस्तूंच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाख कोटींच्या वस्तू खरेदी करतो. हा पैसा पुढे जाऊन आमच्या सीमेवर शस्त्र आणि बंदूक होऊन आमच्या सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो. यासाठी आमच्या देशातील १४० कोटी लोकांंनी आणि तीन कोटी लोक जे विदेशात राहतात त्यांनी एकत्र येऊन जर भारतात आणि जगात एक बायकॉट मूव्हमेंट चायना (बहिष्कार चळवळ) सुरू केली तर? त्यांची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. जनतेत रोष निर्माण होईल. त्यानंतर विरोध आणि सत्तांतर. आपल्या लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. मी नेहमीच सांगतो की, २१ व्या शतकात देशासाठी जीव देण्याची नव्हे, तर नवं आयुष्य देण्याची गरज आहे. आपणही आपली भूमिका पार पाडा. जय हिंद.‘मेड इन चायना आयुष्यातून काढणार’एकीकडे आमचे तरुण चिनी गेम्स, अ‍ॅप, टिकटॉक यात व्यस्त आहेत. कोट्यवधी रुपये चीनला पाठवीत आहेत. त्यासाठी एक नागरिक म्हणून आम्ही उत्तर द्यायला हवे. बहिष्काराची मोहीम भारतासाठी वरदान सिद्ध होईल. आमच्या पंतप्रधानांनी एक व्हिजन आम्हाला दिले आहे. स्वावलंबनाचे. यातून देशातील कामगारांना रोजगार मिळेल.आमच्या तरुणांनी एका आठवड्यात चिनी सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करावे. त्यांचे हार्डवेअर वापरणे कमी करीत जावे. मी नेमके काय करणार आहे? माझ्या फोनवर जे काही चिनी अ‍ॅप आहेत ते एका आठवड्यात हटविणार आहे. तसेच, हा जो फोन चीनमध्ये बनला आहे तोही एका आठवड्यात वेगळा करणार आहे.ज्या वस्तूंवर मेड इन चायना लिहिले आहे त्यांना आयुष्यातून काढणार आहे. मला चीन अथवा चिनी लोकांपासून काही समस्या नाही. चीन सरकार आणि त्यांच्या भूमिकेची समस्या आहे. जोपर्यंत चीनमध्ये परिवर्तन होत नाही आम्हाला असे करावे लागेल.

टॅग्स :chinaचीन