शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

केवळ सैनिकांनीच नाही, तर नागरिकांनीही प्रत्युत्तर द्यावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:38 IST

शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोनम वांग्चुक यांचे मत : चीनवर बहिष्काराची मोहीम भारतासाठी सिद्ध होईल वरदान

चीन : चीन आणि भारत यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आपली काय जबाबदारी आहे? जेव्हा सीमेवर तणाव निर्माण होतो तेव्हा सामान्य नागरिक हा विचार करून झोपी जातो की, सैनिक याला प्रत्युत्तर देतील; पण आज मी लोकांना सांगू इच्छितो की, यावेळी केवळ सैनिकांचे उत्तर नव्हे, तर नागरिकांचेही प्रत्युत्तर यायला हवे, अशा शब्दांत शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रयोगकर्ते सोनम वांग्चुक यांनी आपले विचार व्यक्त केले.

वांग्चुक म्हणाले की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि देशांच्या दुसऱ्या शहरांतील लोक काय करू शकतात? यासाठी आम्हाला अगोदर चीनच्या कुरापती आणि ते असे का करीत आहेत, ते समजून घ्यावे लागेल. हे केवळ भारतासोबत होत नाहीय. चीन गत काही आठवड्यांपासून दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, र्तैवान आणि आता हाँगकाँगसोबत कुरापती काढत आहे. मला असे वाटते की, एखाद्या देशाशी दुश्मनीपेक्षा ते आपल्या अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी असे करीत आहे. आज चीनला सर्वाधिक भीती आतून आहे. कारण, १४० कोटी लोक वेठबिगारांप्रमाणे काम करीत आहेत. ते नाराज होतील तेव्हा क्रांती होऊ शकते. त्याला चीन घाबरतो. कोरोनानंतर तेथे बेरोजगारी वाढली आहे. लोक नाराज आहेत. क्रांती होऊ शकते. सत्तापालट होऊ शकतो. त्यामुळे शेजाऱ्यांशी दुश्मनी करत जनतेला आपल्यासोबत घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चार वर्षे दुष्काळ आणि भूकमारी झाल्याने १९६२ मध्ये भारतासोबत चीनने लढाई केली होती.

जरा विचार करा आम्ही भारतीय उद्योजकांना मारून चीनच्या कपड्यापासून ते अन्य वस्तूंच्या माध्यमातून दरवर्षी पाच लाख कोटींच्या वस्तू खरेदी करतो. हा पैसा पुढे जाऊन आमच्या सीमेवर शस्त्र आणि बंदूक होऊन आमच्या सैनिकांच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकतो. यासाठी आमच्या देशातील १४० कोटी लोकांंनी आणि तीन कोटी लोक जे विदेशात राहतात त्यांनी एकत्र येऊन जर भारतात आणि जगात एक बायकॉट मूव्हमेंट चायना (बहिष्कार चळवळ) सुरू केली तर? त्यांची अर्थव्यवस्था डळमळीत होईल. जनतेत रोष निर्माण होईल. त्यानंतर विरोध आणि सत्तांतर. आपल्या लोकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. मी नेहमीच सांगतो की, २१ व्या शतकात देशासाठी जीव देण्याची नव्हे, तर नवं आयुष्य देण्याची गरज आहे. आपणही आपली भूमिका पार पाडा. जय हिंद.‘मेड इन चायना आयुष्यातून काढणार’एकीकडे आमचे तरुण चिनी गेम्स, अ‍ॅप, टिकटॉक यात व्यस्त आहेत. कोट्यवधी रुपये चीनला पाठवीत आहेत. त्यासाठी एक नागरिक म्हणून आम्ही उत्तर द्यायला हवे. बहिष्काराची मोहीम भारतासाठी वरदान सिद्ध होईल. आमच्या पंतप्रधानांनी एक व्हिजन आम्हाला दिले आहे. स्वावलंबनाचे. यातून देशातील कामगारांना रोजगार मिळेल.आमच्या तरुणांनी एका आठवड्यात चिनी सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करावे. त्यांचे हार्डवेअर वापरणे कमी करीत जावे. मी नेमके काय करणार आहे? माझ्या फोनवर जे काही चिनी अ‍ॅप आहेत ते एका आठवड्यात हटविणार आहे. तसेच, हा जो फोन चीनमध्ये बनला आहे तोही एका आठवड्यात वेगळा करणार आहे.ज्या वस्तूंवर मेड इन चायना लिहिले आहे त्यांना आयुष्यातून काढणार आहे. मला चीन अथवा चिनी लोकांपासून काही समस्या नाही. चीन सरकार आणि त्यांच्या भूमिकेची समस्या आहे. जोपर्यंत चीनमध्ये परिवर्तन होत नाही आम्हाला असे करावे लागेल.

टॅग्स :chinaचीन