शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 08:23 IST

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे.

-याेगी आदित्यनाथ

शेकडो वर्षांची प्रतीक्षा, अनेक पिढ्यांचा संघर्ष आणि पूर्वजांच्या व्रताचे साफल्य. सनातन संस्कृतीचे प्राण रघुनंदन राघवन रामलल्ला आपल्या जन्मभूमीत अवधपुरीतील भव्य अशा नव्या मंदिरात सिंहासनाधिष्ठित होताहेत. ५०० वर्षांनंतर आलेल्या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण भारत आज भावव्याकूळ झालेला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष रामभूमीकडे असून प्रत्येक रस्ता श्रीरामजन्मभूमीकडेच येत आहे. डोळ्यांत आनंदाचे अश्रू आणि जिभेवर रामनाम. सारा देश राममय झाला आहे. देशाला या दिवसाचीच तर प्रतीक्षा होती. याची वाट पाहत कित्येक पिढ्या निजधामाला गेल्या. आज केवळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नसून लोकांची आस्था आणि विश्वासाची पुन:प्रतिष्ठा होत आहे.

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा महायज्ञ केवळ सनातन आस्था आणि विश्वासाच्या परीक्षेचाच काळ नव्हता, तर संपूर्ण भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधताना त्याने सामूहिक चेतना निर्माण केली. एखाद्या देशातील बहुसंख्य समाजाने आपल्या आराध्य देवतेच्या जन्मस्थळी मंदिर बांधण्यासाठी इतकी वर्षे आणि इतक्या पातळीवर लढाई करावी हे जगातले कदाचित पहिलेच अनोखे उदाहरण असेल. समाजातल्या सर्व जातीपातींनी, सर्व थरातील लोकांनी राम डोळ्यांसमोर ठेवून काम केले. संतांनी आशीर्वाद दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्यासारख्या संघटनांनी आखणी करून लोकांना एकत्र आणले व संकल्प सिद्धीस गेला.

पृथ्वीवरील अमरावती आणि भूमीवरील वैकुंठ म्हणवल्या जाणाऱ्या अयोध्येला शेकडो वर्षे शाप भोगावा लागला. ज्या देशात रामराज्य आदर्श म्हणून स्वीकारले गेले, त्याच देशात श्रीरामांना अस्तित्वाचे प्रमाणपत्र द्यावे लागले, साक्षीपुरावे समोर ठेवावे लागले. मात्र, श्रीरामाचे जीवनच मर्यादेची शिकवण देते. त्यातूनच रामभक्तांनी धीर सोडला नाही. मर्यादा उल्लंघली नाही. आमच्या व्रताची पूर्णाहुती देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. २२ जानेवारी २०२४ हा माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस.

श्रीरामजन्मभूमीमुक्तीच्या संकल्पातूनच मला पूज्य गुरुदेव महंत अवैद्यनाथ यांचे सान्निध्य लाभले. प्राणप्रतिष्ठेच्या या क्षणाला माझे गुरू ब्रह्मलीन महंत श्री दिग्विजय नाथ आणि अवैधनाथ महाराज तसे इतर संतगणांचा आत्मा नक्कीच संतुष्टी पावेल. ज्या संकल्पाला माझे गुरुजन आजीवन जोडलेले होते त्याच्या सिद्धीचा मी साक्षी होत आहे हे माझे सौभाग्य होय. प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वांनाच या दिवसाची प्रतीक्षा आहे. या समारंभात श्रीरामलल्लांच्या समोर पंतप्रधान १४० कोटी भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतील. अयोध्येत भारताच्या लघु रूपाचे दर्शन होईल.

उत्तर प्रदेशच्या २५ कोटी लोकांच्या वतीने अयोध्याधामात मी सर्वांचे अभिनंदन करतो. प्राणप्रतिष्ठेनंतर जगभरातील रामभक्त, पर्यटक, संशोधक, जिज्ञासूंचे अयोध्येत स्वागत होईल. त्यासाठी अयोध्यापुरीत सर्व व्यवस्था केली जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, विस्तारित रेल्वे स्टेशन, चारही दिशांना चार-सहा पदरी रस्ते, कनेक्टिव्हिटी, हेलिपोर्ट, सुविधायुक्त हॉटेल्स सगळे उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्कृती संवर्धन, पर्यटनाला प्रोत्साहन आणि रोजगारालाही त्यातून संधी मिळेल. श्रीरामजन्मभूमी मंदिराची स्थापना भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आध्यात्मिक अनुष्ठान असून हे राष्ट्र मंदिरच आहे. अवधपुरीत श्रीरामलल्ला विराजमान होणे ही भारतात रामराज्याच्या स्थापनेची उद्घोषणा आहे. सब नर करही परस्पर प्रीती। चलही स्वधर्म निरत श्रुति नीती| ही परिकल्पना प्रत्यक्षात आली आहे.  आम्हाला आनंद आहे, मंदिर तेथेच उभे राहिले, जेथे ते बांधण्याची शपथ घेतली होती.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ