शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘इंडिया’ आघाडी नव्हे ही ‘घमंडिया’ आघाडी, प्रत्येकाला नवरदेव व्हायचे आहे : पंतप्रधानांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 05:57 IST

मोदी म्हणाले की, विरोधकांना देशाच्या सामर्थ्यावर, परिश्रम आणि पराक्रमावर विश्वास नाही. आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आपण म्हटले होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांच्या इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांची इंडिया आघाडी नाही, तर घमंडिया आघाडी आहे. आघाडीच्या वरातीतील प्रत्येकाला नवरदेव व्हावेसे वाटते आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘घमंडिया’ आघाडी घराणेशाहीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, लोकनायक जयप्रकाश, डॉ. लोहिया यांनी घराणेशाहीवर उघड टीका केली. घराणेशाहीमुळे सामान्य नागरिक त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहिले. काँग्रेसला घराणेशाही आवडते, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

त्यांना ‘एनडीए‘चाच आधारमोदी म्हणाले की, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ‘एनडीए‘चाच आधार घ्यावा लागला आहे. पण त्यात घमेंडीचे दोन ‘आय’ घुसवले. पहिला ‘आय’ २६ पक्षांची घमेंड आणि दुसरा ‘आय’ एका कुटुंबाची घमेंड. त्यासाठी इंडियाचेही तुकडे केले. लोकांमध्ये काँग्रेसविषयी अविश्वासाचा भाव अतिशय गहरा आहे. 

काँग्रेस अहंकारात चूरकाँग्रेस अहंकारात इतकी चूर आहे की त्यांना जमीन दिसत नाही. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, त्रिपुरा, ओडिशा, नागालँड, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये १९६२ पासून आजवर लोकांनी काँग्रेसवर अविश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या सामर्थ्यावर काँग्रेस आणि मित्रपक्षांचा कधीच विश्वास राहिला नाही. लाल किल्यावरून देशाला संबोधताना शौचालय, जनधन खाते, योग, आयुर्वेद, स्टार्टअप इंडिया, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया अशा सर्व गोष्टींची त्यांनी खिल्ली उडविली. त्यांचा भारताच्या सैन्यापेक्षा शत्रूंच्या दाव्यांवर, पाकिस्तान, हुरियत, पाकिस्तानचा झेंडा घेणाऱ्यांवर आणि फुटिरवाद्यांवर विश्वास होता.२०२८ मध्ये पुन्हा या सातत्याच्या जोरावर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू. देशाचा विश्वास २०२८ साली जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव मांडाल तेव्हा हा देश पहिल्या तीनमध्ये असेल, असा टोला मोदींनी लगावला.

देशाच्या सामर्थ्यावर विश्वास नाहीमोदी म्हणाले की, विरोधकांना देशाच्या सामर्थ्यावर, परिश्रम आणि पराक्रमावर विश्वास नाही. आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे आपण म्हटले होते.  

या कालखंडाचा प्रभाव हजार वर्षांपर्यंत राहणार मोदी म्हणाले की, कोणत्याही देशाच्या इतिहासात एक वेळ असा येतो जेव्हा जुन्या बंधनांना तोडून नवी ऊर्जा, संकल्पासह पुढे जाण्याचा संकल्प करतो. एकविसाव्या शतकातील हा कालखंड भारतासाठी प्रत्येक स्वप्न सिद्ध करण्याची संधी आमच्या पायाशी येणार आहे, हे आपण अतिशय गंभीरपणे आणि दीर्घ अनुभवांती नमूद करतो आहे. हा कालखंड घडेल त्याचा प्रभाव या देशावर येणाऱ्या एक हजार वर्षांपर्यंत राहणार आहे. भारताच्या युवकांना घोटाळेरहित सरकार, खुल्या आकाशात उडण्याचे प्रोत्साहन आणि संधी दिली आहे. 

विरोधकांना लाभलेले गुप्त वरदानn विरोधक ज्याचे वाईट चिंततात त्याचे कसे भले होते, अशी तीन उदाहरणे देऊन मोदींनी सांगितले. मोदी तेरी कब्र खुदेगी ही त्यांच्यासाठी सर्वात प्रिय घोषणा आहे. त्यांच्या शिव्या, अपशब्द, त्यांच्या भाषेचेही मी टॉनिक बनवले आहे. n ज्याचे वाईट चिंततात त्याचे भलेच होते, असा विरोधकांना एक गुप्त वरदान लाभले आहे, यावर माझा पक्का विश्वास बसला आहे. एक उदाहरण तर इथे माझ्या रूपाने उपस्थितच आहे. n वीस वर्षे झाली. काय नाही केले त्यांनी. पण भलेच होत गेले. बँकिंग क्षेत्र बुडेल, देश उद्ध्वस्त होईल, अशी अफवा पसरविण्याचे काम त्यांनी केले होते. पण झाले उलटेच. सार्वजनिक बँकांचा नफा दुप्पट झाला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन