शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

हिंदू दहशतवादी नव्हे, तर संघी दहशतवादी- दिग्विजय सिंह

By admin | Updated: June 21, 2017 21:35 IST

हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवादाची सगळीकडेच चर्चा आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर "हिंदू दहशतवाद" हा शब्द रूढ केल्याचा आरोप हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनिल वीज यांनी केला आहे. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, असंही अनिल वीज म्हणाले होते. त्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. 2006 ते 2008 या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला होता. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचंही नाव पुढे आलं होतं. तसेच या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.तत्पूर्वी अनिल वीज म्हणाले होते, समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातील जे लोक पकडण्यात आले, त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्याच वेळी हिंदुस्थानातील लोकांना पकडून "हिंदू दहशतवाद" असं नाव देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हा खेळ केला होता आणि काँग्रेसच्याच सांगण्यावरून त्यावेळी त्या पाकिस्तानी नागरिकांना सोडण्यात आलं होतं. काँग्रेसला राजकीय पातळीवर भारतात हिंदू दहशतवाद असल्याचं सिद्ध करायचं होतं. मात्र हिंदू कधीच दहशतवादी होऊ शकत नाहीत. जर हिंदू दहशतवादी असते तर पूर्ण जगात दहशतवाद नसता, दहशतवाद एव्हाना संपला असता. अनिल वीज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ब-याचशा दहशतवादी हल्ल्यात मुस्लिम सामील होण्याच्या कारणास्तव काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद समोर आणू पाहत होते, असा आरोपही अनिल वीज यांनी केला आहे.