शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू दहशतवादी नव्हे, तर संघी दहशतवादी- दिग्विजय सिंह

By admin | Updated: June 21, 2017 21:35 IST

हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवादाची सगळीकडेच चर्चा आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर "हिंदू दहशतवाद" हा शब्द रूढ केल्याचा आरोप हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनिल वीज यांनी केला आहे. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, असंही अनिल वीज म्हणाले होते. त्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. 2006 ते 2008 या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला होता. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचंही नाव पुढे आलं होतं. तसेच या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.तत्पूर्वी अनिल वीज म्हणाले होते, समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातील जे लोक पकडण्यात आले, त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्याच वेळी हिंदुस्थानातील लोकांना पकडून "हिंदू दहशतवाद" असं नाव देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हा खेळ केला होता आणि काँग्रेसच्याच सांगण्यावरून त्यावेळी त्या पाकिस्तानी नागरिकांना सोडण्यात आलं होतं. काँग्रेसला राजकीय पातळीवर भारतात हिंदू दहशतवाद असल्याचं सिद्ध करायचं होतं. मात्र हिंदू कधीच दहशतवादी होऊ शकत नाहीत. जर हिंदू दहशतवादी असते तर पूर्ण जगात दहशतवाद नसता, दहशतवाद एव्हाना संपला असता. अनिल वीज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ब-याचशा दहशतवादी हल्ल्यात मुस्लिम सामील होण्याच्या कारणास्तव काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद समोर आणू पाहत होते, असा आरोपही अनिल वीज यांनी केला आहे.