शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हिंदू दहशतवादी नव्हे, तर संघी दहशतवादी- दिग्विजय सिंह

By admin | Updated: June 21, 2017 21:35 IST

हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवादाची सगळीकडेच चर्चा आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर "हिंदू दहशतवाद" हा शब्द रूढ केल्याचा आरोप हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनिल वीज यांनी केला आहे. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, असंही अनिल वीज म्हणाले होते. त्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे. 2006 ते 2008 या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला होता. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचंही नाव पुढे आलं होतं. तसेच या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.तत्पूर्वी अनिल वीज म्हणाले होते, समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातील जे लोक पकडण्यात आले, त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्याच वेळी हिंदुस्थानातील लोकांना पकडून "हिंदू दहशतवाद" असं नाव देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हा खेळ केला होता आणि काँग्रेसच्याच सांगण्यावरून त्यावेळी त्या पाकिस्तानी नागरिकांना सोडण्यात आलं होतं. काँग्रेसला राजकीय पातळीवर भारतात हिंदू दहशतवाद असल्याचं सिद्ध करायचं होतं. मात्र हिंदू कधीच दहशतवादी होऊ शकत नाहीत. जर हिंदू दहशतवादी असते तर पूर्ण जगात दहशतवाद नसता, दहशतवाद एव्हाना संपला असता. अनिल वीज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ब-याचशा दहशतवादी हल्ल्यात मुस्लिम सामील होण्याच्या कारणास्तव काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद समोर आणू पाहत होते, असा आरोपही अनिल वीज यांनी केला आहे.